• Download App
    Kannada film actress कन्नड चित्रपट अभिनेत्री अन् पोलिस महासंचालकांच्या मुलीस १४ किलो सोन्यासह बंगळुरू विमानतळावर अटक

    कन्नड चित्रपट अभिनेत्री अन् पोलिस महासंचालकांच्या मुलीस १४ किलो सोन्यासह बंगळुरू विमानतळावर अटक

    गेल्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली होती, त्यामुळे तपास यंत्रणांना तिच्यावर आधीच संशय होता. Kannada film actress

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरूतील केंम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. तिच्याकडून १४ किलो सोने जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुबईहून आलेल्या रान्याला तिच्या बेल्टला बांधलेल्या १४ किलो सोन्याचे बार आणि ८०० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह पकडण्यात आले. विशेष म्हणजे ही अभिनेत्री पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे.

    सोमवारी रात्री रान्या राव दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने परतली. गेल्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली होती, त्यामुळे तपास यंत्रणांना तिच्यावर आधीच संशय होता. जेव्हा ती बंगळुरू विमानतळावर पोहोचली तेव्हा अधिकाऱ्यांनी तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवले. तपासणी केल्यावर असे आढळून आले की तिने खूप सोने घातले होते आणि तिच्या कपड्यांमध्ये काही सोन्याचे बार देखील लपवलेले होते. अटकेनंतर, रान्या रावला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

    प्राप्त माहितीनुसार विमानतळावर पोहचल्यानंतर रान्याने सर्वात आधी स्वतःची ओळख कर्नाटक पोलिस महासंचालक यांची मुलगी म्हणून करून दिली आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून तिला घरापर्यंत जाण्यासाठी सुरक्षेची मागणी केली होती. आता अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

    Kannada film actress and daughter of DGP arrested at Bengaluru airport with 14 kg gold

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Khalistani : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी लिहिले खलिस्तानी नारे; दहशतवाद्याने ट्रेनमधील व्हिडिओ जारी केला; खालडांचा उल्लेख

    West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये बोट उलटली, 15 भारतीयांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी होते, यातील बहुतांश पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील होते