• Download App
    'लष्कराचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय', रविशंकर प्रसाद यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र Insulting the army is a habit of Congress Ravi Shankar Prasads criticism of Rahul Gandhi

    ‘लष्कराचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय’, रविशंकर प्रसाद यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

    …हा तुमचा (काँग्रेस पक्षाचा) भूतकाळ आहे, अशी आठवणही करून दिली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी लष्कराचा अपमान करणे ही काँग्रेसची जुनी सवय असल्याचे म्हटले आहे. रविवारी, 20 ऑगस्ट रोजी राहुल गांधी लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले, जिथे त्यांनी दावा केला की चिनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. Insulting the army is a habit of Congress Ravi Shankar Prasads criticism of Rahul Gandhi

    लडाखमध्ये राहुल गांधींच्या वक्तव्यासंदर्भात भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले- ‘राहुल गांधी लडाखला गेले आहेत. ते जिथे जातील तिथे भारतविरोधी बोलायचे हा त्यांचा स्वभाव आहे का? मला राहुल गांधींना विचारायचे आहे की ते आमच्या जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत का? तुम्ही चीनचा प्रोपोगंडा  का होत आहात?

    रविशंकर प्रसाद म्हणाले- ‘ते (काँग्रेस) बालाकोट आणि उरी हल्ल्याचे पुरावे मागतात. आपण त्यांच्याकडून तरी काय अपेक्षा करू शकतो? आज जेव्हा राहुल गांधी लडाखबद्दल बोलतात तेव्हा मला त्यांना विचारायचे आहे की 1962 च्या युद्धापूर्वी आणि नंतर चीनने भारतातील किती भूभाग बळकावला होता हे त्यांना आठवते का? तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी आम्ही पायाभूत सुविधा उभारून चीनला त्रास देऊ इच्छित नाही, असे अँटनी संसदेत म्हणाले होते. हा तुमचा (काँग्रेस पक्षाचा) भूतकाळ आहे.

    Insulting the army is a habit of Congress Ravi Shankar Prasads criticism of Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज