• Download App
    अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाईचा दर घटला, सर्वसामान्यांना दिलासा Inflation rate is going slow

    अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाईचा दर घटला, सर्वसामान्यांना दिलासा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – लॉकडाउनमुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या तसेच इंधनाचे दर वाढल्याने महागाईही वाढली होती. आता मात्र हा दर साडेपाच टक्क्यांच्या मर्यादेत आल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मागील वर्षीच्या जुलै महिन्यात हाच दर ६.७३ टक्के होता. Inflation rate is going slow

    अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात कमी झाला असून तो ५.५९ टक्क्यांवर आला आहे. महागाईचा दर मे महिन्यात ६.३० टक्के तर जून महिन्यात ६.२६ होता.



    जून महिन्यात अन्नधान्यामुळे होणारी चलनवाढ ५.१५ टक्के होती, ती जुलैमध्ये ३.९६ टक्के एवढी कमी झाली. रिझर्व्ह बँकेने नुकतेच पतधोरणाच्यावेळी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत महागाईचा दर ५.९ टक्के राहील असा अंदाज वर्तविला होता. रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय धोरण समितीने चलनवाढीचा आदर्श दर ६ टक्क्यांच्या आत राहायला हवा असे उद्दिष्ट ठेवले आहे. जुलैमधील दर आता त्या टप्प्यातच आहे, असेही दाखवून दिले जात आहे.

    Inflation rate is going slow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Govt Bans : सरकारने 16 औषध संयोजनांवर बंदी घातली; त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादने देखील समाविष्ट, म्हटले – यांच्या उपचारात फायद्यापेक्षा जास्त धोका

    Ram Mandir : राम मंदिर देणगी चोरी- चंपतराय यांच्यावर कारवाई जवळपास निश्चित:विश्वस्त अनिल यांनाही हटवले जाऊ शकते, SIT योगींना अहवाल सादर करणार

    PM Modi : मोदी म्हणाले- बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न झाला; धार्मिक अजेंडा राबवला गेला, घुसखोरांकडून ताबा मिळवला गेला; आता कायद्याचे राज्य