भारतीय हवामान विभाग (IMD) ने १ आणि २ डिसेंबर रोजी गुजरातच्या काही भागात खूप मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. Indian Meteorological Department: Warning of heavy rains in Gujarat, farmers and fishermen given ‘this’ information; Orange and Yellow alerts issued to ‘this’ districts
विशेष प्रतिनिधी
गुजरात : सध्या पावसाने सगळीकडेच हजेरी लावली आहे.दरम्यान भारतीय हवामान विभाग (IMD) ने १ आणि २ डिसेंबर रोजी गुजरातच्या काही भागात खूप मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. IMD ने १ डिसेंबर रोजी गुजरातमधील आणंद, भरुच, नवसारी, वलसाड, अमरेली आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि २ डिसेंबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.
सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, काल ३० नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान काल रात्रीपासूनच उत्तर पश्चिम आणि लगतच्या मध्य भारतावर त्याचा परिणाम दिसला आहे.त्याचबरोबर ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उत्तर आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर मच्छिमारांना न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच शेतकर्यांना त्यांच्या पिकांसाठी आणि अवकाळी पावसामुळे उभ्या राहिलेल्या पिकांसाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आयएमडीने सांगितले की,१ डिसेंबर रोजी आनंद, भरूच, नवसारी, वलसाड, सुरत, डांग आणि तापी, अमरेली, जुनागढ, गीर सोमनाथ, बोटाड आणि सौराष्ट्र जिल्ह्यातील भावनगर तसेच पंचमहाल, दाहोद, छोटा उदेपूर येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. आहे. तर दुसरीकडे २ डिसेंबर रोजी बनासकांठा, साबरकांठा, अरवली, महिसागर, डांग आणि तापी या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उत्तर गुजरात किनारपट्टी आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर ४० – ५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.तसेच जाखाऊ, मांडवी (कच्छ), मुंद्रा, न्यू कांडला, नवलखी, जामनगर, सलाया, ओखा आणि पोरबंदरसह उत्तर गुजरातच्या किनारपट्टीवर मच्छिमारांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
Indian Meteorological Department: Warning of heavy rains in Gujarat, farmers and fishermen given ‘this’ information; Orange and Yellow alerts issued to ‘this’ districts
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना हा फर्जीवाडा ,WHO मध्ये काळेबेरे; कालीपुत्र कालीचरण महाराज याचे टीकास्त्र
- एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ; अनिल परब यांनी दिली महत्वाची माहिती
- गोरगरीबांसाठीच्या उज्वला योजनेतही माध्यमाकडून राजकारण, मोदी सरकारने २०१९ पूर्वीच बहुतांश गरजुंपर्यंत पोहोचण्याचा केला प्रयत्न
- पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह
- मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली, चंद्रकांत पाटील यांचा आरोप