• Download App
    भारत बनला जगज्जेता, विश्वचषकमध्ये अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघांचा पराभव। India won the World Cup Defeat of England in the final

    भारत बनला जगज्जेता, विश्वचषकमध्ये अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघांचा पराभव

    विशेष प्रतिनिधी

    अँटिग्वा :अंडर १९ वर्ल्डकपच्या अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ पराभव केला आणि विश्वविजेतेपदावर नाव कोरले. India won the World Cup Defeat of England in the final

    भारत पाचव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तो त्यांच्या अंगउलट आला. ९१ धावात ५ गडी बॅड झाले. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज टाकले नाहीत. संघ १८९ धावांत बाद झाला. इंग्लंडकडून जेम्स रियूने ९५ धावांची झुंज दिली. तर बावाने ५ बळी घेतले.



    प्रत्युत्तरात भारताने सहा फलंदाज गमावले. पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

    India won the World Cup Defeat of England in the final

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी

    Unnao Rape Case : उन्नाव रेप केस- कुलदीप सेंगरच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले