• Download App
    पुढील वर्षी सर्वाधिक विकासाचा दर भारतातच, लसीकरण आणि अर्थसंकल्पातील उचलेल्या पावलांना मिळणार यश|India will have the highest growth rate next year, with vaccination and budgetary measures being successful

    पुढील वर्षी सर्वाधिक विकासाचा दर भारतातच, लसीकरण आणि अर्थसंकल्पातील उचलेल्या पावलांना मिळणार यश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा विकास प्रमुख देशांमध्ये सर्वात वेगाने होईल. याचे कारण तिसरी लाट कमी होणे आणि लसीकरणाच्या वेगासह अर्थसंकल्पात उचललेली पावले याला मिळालेले यश आहे, असे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने आपल्या मासिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली आहे.India will have the highest growth rate next year, with vaccination and budgetary measures being successful

    अहवालात म्हटले आहे की 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 6.6% घट झाली आहे. 2022-23 मध्ये प्रमुख देशांमधील अर्थव्यवस्था आता सर्वात वेगाने वाढेल असा अंदाज आहे. उत्पादन आणि बांधकाम या वाढीला चालना देईल. यामध्ये पीएलआय योजनेचा मोठा वाटा असेल.



    अहवालात म्हटले आहे की कोरोना महामारीमुळे अनिश्चितता कमी झाल्याने देशात खप वाढेल आणि मागणी सुधारेल. त्याचबरोबर नेट सोन एरिया (पेरणी क्षेत्र) आणि पीक वैविध्य यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. हे फूड बफर मजबूत करेल. एमएसपी आणि पीएम किसान सारख्या योजना शेतकºयांना मदत करतील.

    भारत हा एकमेव मोठा देश आहे ज्याचा 2022-23 साठी वाढीचा अंदाज मुडीने वरच्या दिशेने रिव्हाइज केला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात भारताच्या अर्थव्यवस्थेची जी दिशा ठरवण्यात आली होती ती यंदाच्या अर्थसंकल्पामुळे अधिक मजबूत झाल्याचेही यात म्हटले आहे.

    India will have the highest growth rate next year, with vaccination and budgetary measures being successful

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे