कझाखस्तान – घुसखोरी हा राजकीय धोरणांचा भाग नसून इतरांना त्रास देण्याचाच प्रकार आहे. कोरोना आणि पर्यावरण बदल या संकटांविरोधात ज्याप्रमाणे जग एकत्र आले, त्याचप्रमाणे दहशतवादाचेही संकट मोठे असून त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्य क आहे,’ असे आवाहन भारताने केले आहे. India targets Paksitan
कझाकस्तानमध्ये ‘कॉन्फरन्स ऑफ इंटरॲक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स इन एशिया’ (सीआयसीए) या परराष्ट्र मंत्री पातळीवरील परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. ‘दुसऱ्याच्या सार्वभौमतेचा आदर करणे, हा आंतरराष्ट्रीय संबंधांचा आधार आहे.
शांतता आणि विकास ही आपली समान उद्दीष्टे असतील, तर दहशतवाद हा आपला समान आणि सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाचा वापर इतर देशांविरोधात केला जाऊ नये. घुसखोरी हे राजकीय धोरण नसून तो दहशतवादाचाच एक प्रकार आहे,’ असे जयशंकर म्हणाले.
India targets Paksitan
महत्त्वाच्या बातम्या
- पतीला सोडल्यानंतर तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे प्रियकरासोबत रोमँटिक फोटोशूट
- आर्यन खानच्या अटकेला मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून धार्मिक रंग, धार्मिक तेढ पसारविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
- स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे निमलष्करी दलात नोकरीची संधी आहे. पोलीस उपनिरीक्षकपासून अनेक पदे भरली जाणार आहेत.
- अल्पवयीन मुलीवर 28 जणांचा बलात्कार, समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा