विशेष प्रतिनिधी
चंदीगड : मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि रवींद्र जडेजा आणि अश्विन मैदानावर उभे आहेत. त्यांची अर्धशतके झाली असून दोघांमध्ये १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. भारताची धावसंख्या ४५० च्या पुढे गेली आहे. India score 450 ahead
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात संघाच्या पहिल्या आठ फलंदाजांनी कसोटी डावात २५ पेक्षा जास्त धावा करण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. विशेष म्हणजे भारताने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कामगिरी केली होती.जडेजाने पूर्ण केले शतक डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजाने शानदार फलंदाजी करताना शतक पूर्ण केले. त्याने १६० चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.
रवींद्र जडेजा आणि अश्विनने मिळून भारताच्या ४५० धावा पूर्ण करून श्रीलंकेच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी आसुसले. भारतीय जोडी संघाला मोठ्या आणि मजबूत धावसंख्येकडे घेऊन जात आहे. दरम्यान, भारताने ४५० धावा पूर्ण केल्या आहेत. १०८ षटकांनंतर भारताची धावसंख्या: ४५१/६ रवींद्र जडेजा (९३), अश्विन (५६)
जडेजा-अश्विनची शतकी भागीदारी
रवींद्र जडेजा आणि अश्विन या हिट जोडीने शानदार फलंदाजी करताना पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली आहे. दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.
India score 450 ahead
महत्त्वाच्या बातम्या
- Sanjay Raut phone tapping : महाराष्ट्रात सत्ता मिळवायला केजीबी, सीआयएला आणा, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
- मैं मर जाऊंगा, मगर झूठ नहीं बोलूंगा; राहुल गांधी यांचा मोदींना टोमणा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास फेटा; रविवारच्या पुणे दौऱ्यानिमित्त मोठी तयारी
- आठवड्यात युक्रेनवर ५०० क्षेपणास्त्रांनी हल्ला
- नाटो, युरोपीय महासंघानी घातले राशियासमोर शेपूट; युक्रेनच्या मदतीचा नुसताच आव; ठोस पावले नाहीत
- U. P. election – मी मेलो तरी चालेल, पण तुमच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्याचे मी खोटे सांगणार नाही, राहुल गांधींची वाराणसीत टोलेबाजी