हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे घोषवाक्य “अब की बार, सौ पार” आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतच्या आपल्या सर्वाधिक पदकांचा विक्रम मोडला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 70 पदके जिंकली होती, परंतु यावेळी भारताने आतापर्यंत एकूण 71 पदके जिंकली आहेत.India broke its own record by winning 71 medals in the Asian Games
आज(4 ऑक्टोबर ) भारताने तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, हे एशियाडमध्ये 71 वे पदक ठरल्याने भारताने स्वत:चाच 70 पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. 1951 मध्ये भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण 51 पदके जिंकण्याचा विक्रम केला होता, ज्यापैकी 15 सुवर्ण पदके होती.
खरं तर, मंजू राणी आणि राम बाबू या चार भारतीय खेळाडूंनी आज 35 किमीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, ज्यामुळे 2018 च्या खेळांमधील भारताच्या 70 पदकांची बरोबरी झाली. त्यानंतर ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांच्या मिश्र तिरंदाजी संघाने सुवर्णपदक जिंकले, हे भारताचे 71 वे पदक ठरले आहे.
भारताचे मिशनचे प्रमुख भूपेंद्र सिंह बाजवा म्हणाले, “मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत 70 चा टप्पा ओलांडून आपल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीसह आपली छाप सोडली आहे आणि आणखी पदके येणे बाकी आहेत.”
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी टीम पाठवली आहे आणि या स्पर्धेत 100 पदकांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आहे. हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे घोषवाक्य “अब की बार, सौ पार” आहे. भारताने आतापर्यंत चार दिवसांच्या स्पर्धा शिल्लक असताना 16 सुवर्ण, 26 रौप्य आणि 29 कांस्य पदके जिंकली आहेत.
India broke its own record by winning 71 medals in the Asian Games
महत्वाच्या बातम्या
- VIDEO : ‘स्वदेस’फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात!
- शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धव शिवसेना वळणावर; पक्षपाताचा आरोप केला निवडणूक आयोगावर!!
- बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी
- आप खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा; दिल्लीतील घराची झडती, अबकारी धोरण केसच्या आरोपपत्रात नाव