देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याने भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन हळूहळूअनलॉक करण्याच्या प्रक्रियेसह प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केली आहे.Increase in the number of trains due to declining corona patients
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याने भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन हळूहळून अनलॉक करण्याच्या प्रक्रियेसह प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केली आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहार मधील लोकांची सुविधा पाहता गोरखपुर-पनवेल, दिल्ली-गोरखपूर तसेच छपरा-पनवेल या दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून 12 जून्पासून स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार आहेत.
या रेल्वेगाड्या उत्तर प्रदेशातील झासी, कानपुर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, सीतापुर, बलिया सारख्या शहरांमधून जाणार आहेत. उत्तर रेल्वेनुसार या समर स्पेशल ट्रेन पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता काही स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार येथील ट्रेनचा समावेश आहे. या गाड्या वांद्रे, अहमदाबाद, छपरा, मऊ, समस्तीपुर, गुवाहाटी, राजकोटसह काही शहरांमध्ये धावणार आहेत.
Increase in the number of trains due to declining corona patients
महत्त्वाच्या बातम्या
- ३२ वर्षाची विवाहित महिला १४ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात वेडी झाली आणि त्याला पळवून घेऊन गेली
- दिलासादायक, अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाही परकीय गंगाजळी ६०० अब्ज डॉलर्सवर
- मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरे प्रथमच दिल्लीला जाणार, मराठा आरक्षणावर पंतप्रधानांची भेट घेणार
- मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश