• Download App
    राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तब्बल 48 हजार जणांना डिस्चार्ज|In Maharashtra Big drop in number of Coronavirus patients, discharge of 48,000 people

    Corona Updates राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तब्बल 48 हजार जणांना डिस्चार्ज

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असून 30 हजारांच्या आत आला. सोमवारी तब्बल 48 हजार 211 जणांना घरी सोडले. तर 26 हजार 616 रुग्णांची नोंद झाली. 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. In Maharashtra Big drop in number of Coronavirus patients, discharge of 48,000 people

    मुंबईत रुग्णसंख्येत घट

    मुंबईत 1240 रुग्णांची नोंद झाली तर 2587 जणांना डिस्चार्ज दिला. 48 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 34 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आतापर्यंत 6,89,936 रुग्णसंख्या झाली. पैकी 6,39,340 रुग्ण घरी गेले आहेत. तर 14 हजार 308 जण मरण पावले आहेत.



    पुणे शहरात कमालीची घट

    पुणे शहरात 684 रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 4 लाख 59 हजार 987 झाली. दिवसभरात 2 हजार 790 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 33 हजार 798 झाली आहे.

    दिवसभरात 7 हजार 862 टेस्ट

    पुणे शहरात एकाच दिवसात 7 हजार 862 नमुने घेतले आहेत. एकूण टेस्ट संख्या 23 लाख 72 हजार 34 झाली. 18 हजार 440 रुग्णांपैकी 1402 रुग्ण गंभीर तर 5,287 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

    नव्याने 43 जणांचा मृत्यू

    पुणे महापालिका हद्दीत नव्याने 43 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची एकूण संख्या 7 हजार 749 झाली आहे. दरम्यान, लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवारी ( ता. 18) पुणे महापालिका हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.

    राज्यातील आकडेवारी

    • 24 तासांत मृत्यू : 516
    • नवीन रुग्ण : 26,616
    • बरे : 48,211
    • एकूण रुग्णसंख्या : 54,05,068
    • एकूण बरे : 48,74,582
    • एकूण मृत्यू : 82 हजार 486
    • सक्रीय रुग्ण : 4,45,495

    In Maharashtra Big drop in number of Coronavirus patients, discharge of 48,000 people

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये

    माजी सरन्यायाधीश गवई म्हणाले-आरक्षण म्हणजे मागे राहिलेल्यांना समानता देणे, नवीन लोकांसाठी मार्ग बंद करणे नाही