खासदार कंगना रणौत यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Kangana Ranaut वन नेशन, वन इलेक्शन या विधेयकाला मोदी सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. सरकार पुढील आठवड्यात हे विधेयक सभागृहात मांडू शकते. सरकारच्या या पावलाचा संदर्भ देत भाजप खासदार कंगना रणौत यांनी तिची प्रतिक्रिया शेअर केली आहे.Kangana Ranaut
कंगना रणौत म्हणाल्या, “वन नेशन वन इलेक्शन खूप महत्वाचे आहे कारण दर 6 महिन्यांनी निवडणुका घेतल्याने सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान होते. सर्वात मोठे आव्हान हे आहे की लोकांना पाच वर्षांत अनेक वेळा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी मतदान करावे लागते. मतदानाची टक्केवारी सातत्याने कमी होत आहे, जो चिंतेचा विषय आहे.
माहितीनुसार, सरकार या विधेयकावर सर्वसमावेशक चर्चेसाठी संयुक्त संसदीय समिती किंवा जेपीसीकडे पाठवू शकते. 100 दिवसांच्या आत शहरी संस्था आणि पंचायत निवडणुकांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.
How will One Nation One Election benefit the country
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojna मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बदलांच्या सोशल मीडियात अफवा; प्रशासनाचा स्पष्ट खुलासा!!
- Sambhal : संभल हिंसाचार प्रकरणी पोलिसांची कारवाई तीव्र
- Manish Sisodia : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा\
- Punjab : पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये NIAचे छापे!