• Download App
    कुबड्या केव्हापर्यंत घेणार? काँग्रेसने स्वत:च्या पायावर उभे राहावे, तारीक अन्वर यांनी सुनावले|How long will the crutches last? Congress should stand on its own feet, said Tariq Anwar

    कुबड्या केव्हापर्यंत घेणार? काँग्रेसने स्वत;च्या पायावर उभे राहावे, तारीक अन्वर यांनी सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकेकाळी स्वबळावर निवडणुका लढणारा काँग्रेस पक्ष आता कुबड्यांच्या आधारावर उभा आहे. या कुबड्या केव्हापर्यंत घेणार आहोत. आता पुन्हा एकदा काँग्रेसला आपल्या पायावर उभे राहावे लागणार आहे, असा घरचा अहेर पक्षाचे वरिष्ठ नेते तारिक अन्वर यांनी दिला आहे.How long will the crutches last? Congress should stand on its own feet, said Tariq Anwar

    बिहारमध्ये विधानसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. राजदसोबतची आघाडी पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. बिहारमध्ये काँग्रेस पक्ष अतिशय कमजोर झाला आहे. या पोटनिवडणुकीचे निकाल हेच सांगत आहेत की, आता स्वत:ला मजबूत करण्याची वेळ आलेली आहे. आपण जोपर्यंत संघटना मजबूत करणार नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षासोबतची आघाडी यशस्वी ठरणार नाही.



    राजदने आघाडी तोडण्याबाबत भक्त चरण दास यांनी केलेले वक्तव्य सत्य आहे. त्यांनी दोन्ही जागांवर उमेदवार दिले. भविष्यात आघाडी झाली, तरी ती सन्मानजनक व्हावी, यासाठी काँग्रेसला स्वत:च्या पायावर उभे राहावेच लागेल. पक्ष संघटन बळकट करावेच लागणार आहे, असे तारिक अन्वर यांनी सांगितले.

    बिहारमध्ये विधानसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या मुद्यावर काँग्रेस आणि राजदने आघाडी तोडण्याची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उतरवले. मात्र, काँग्रेस आणि राजदच्या उमेदवारांचा पराभव झाला. काँग्रेस या दोन मतदारसंघांत अनामत रक्कमही वाचवू शकली नाही.

    How long will the crutches last? Congress should stand on its own feet, said Tariq Anwar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही

    Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह