भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हाहाकार पाहायला मिळत आहे. दिल्लीपासून गुजरात ( Gujrat )आणि राजस्थानपर्यंत ( Rajstan ) मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसानंतर पूर आला आहे. राज्यात नद्यांना उधाण आले आहे. परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्याचबरोबर हवामान खात्यानेही अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. एनडीआरएफ व्यतिरिक्त, एसडीआरएफ, लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल देखील बचाव कार्यात गुंतले आहेत.
दुसरीकडे, गुजरात व्यतिरिक्त, हवामान खात्याने दिल्ली, महाराष्ट्र, बंगाल, तेलंगणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसह 14 राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे.
रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर वाहने रेंगाळताना दिसत होती. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
heavy rains wreak havoc in 14 states
महत्वाच्या बातम्या
- Japan : जपानमध्ये तांदळाची तीव्र टंचाई, सुपरमार्केट्स झाली रिकामी, भूकंप-वादळाच्या भीतीने घराघरांत केला जातोय साठा
- काँग्रेसच्या सर्व्हेत राष्ट्रीय पक्षांनाच मोठ्या यशाची हमी; ठाकरे – पवारांचा नुसताच बोलबाला, प्रत्यक्षात ते 60 – 60 जागांचे धनी!!
- Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अभियंता चेतन पाटीलने झटकले हात!!
- Farhatullah Ghauri’s : पाकिस्तानी दहशतवादी फरहतुल्ला गौरीची भारतावर हल्ल्याची धमकी; स्लीपर सेलला गाड्या रुळावरून उतरवण्यास सांगितले