• Download App
    राहुल गांधींच्या सेवेत दिलेले दोन कर्मचारी केरळच्या डाव्या सरकारने काढून घेतले!!|government of Kerala sacked two employees given to Rahul Gandhi!!

    राहुल गांधींच्या सेवेत दिलेले दोन कर्मचारी केरळच्या डाव्या सरकारने काढून घेतले!!

    वृत्तसंस्था

    तिरुअनंतपुरम : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवणाऱ्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर बाकीचे राजकीय परिणाम दिसलेच आहेत. पण त्या पलीकडे जाऊन आता केरळ मधल्या डाव्या सरकारने खासदार म्हणून राहुल गांधींना वैयक्तिक सेवेसाठी दिलेले दोन कर्मचारी काढून घेतले आहेत.government of Kerala sacked two employees given to Rahul Gandhi!!

    राहुल गांधींच्या सेवेत असणारे वाहन चालक मोहम्मद रफी आणि त्यांचे केरळ पुरते खाजगी सचिव रतिष कुमार यांना राहुल गांधींच्या सेवेतून दूर करण्यात आले आहे. त्यांची ओळखपत्रे सरकारी कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेश या दोघांनाही बजावण्यात आले आहेत.



    देशातले सर्व चोर मोदी कसे?, असा सवाल राहुल गांधींनी एका सभेत केला होता. त्यावर मोदी नामक एका व्यक्तीने सुरत कोर्टात केस दाखल केली होती. या केसचा निकाल देताना सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवले होते. कोर्टाने दोषी ठरवल्यामुळे लोकसभा सचिवालयाने नियमानुसार त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे राहुल गांधी हे केरळ मधल्या वायनाडचे काँग्रेसचे लोकप्रतिनिधी उरले नाहीत. त्यामुळे आता केरळ सरकारने राहुल गांधींना खासदार म्हणून दिलेले दोन कर्मचारी त्यांच्या सेवेतून दूर केले आहेत.

    राहुल गांधींची खासदारकी नियमानुसार रद्द झाली असली तरी काँग्रेसने मात्र त्या मुद्द्यावर देशभरात भाजप विरुद्ध मोठा गदारोळ करून रान उठविले होते. पण आता मात्र त्यांच्या सेवेतले दोन सरकारी कर्मचारी दूर करण्याचा निर्णय भाजपने नव्हे, तर केरळ मधल्या डाव्या पक्षांच्या सरकारने घेतला आहे.

    government of Kerala sacked two employees given to Rahul Gandhi!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Kangana Ranaut : कंगना यांनी भटिंडा कोर्टात मागितली माफी, म्हणाल्या- गैरसमज झाला, माझा तसा हेतू नव्हता

    B.R. Gavai, : सर्वोच्च न्यायालयाचे 53 वे सरन्यायाधीश होणार सूर्यकांत, CJI बीआर गवई यांनी नावाची शिफारस केली; कार्यकाळ 14 महिन्यांचा

    PM-Kisan : PM-किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता नोव्हेंबरमध्ये येणार; मोदी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये ट्रान्सफर करतील