४ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी ( farmers ) सरकार सातत्याने पावले उचलत आहे. त्यांच्या उन्नतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम केले जात आहे. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही आपापल्या स्तरावर योजना राबवितात, काही योजना शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी असतात तर काही आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी असतात.
पीएम किसान सन्मान निधीपासून अशा अनेक योजनांचा देशातील ९ कोटींहून अधिक शेतकरी बांधव लाभ घेत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेची ही बातमी आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे.
१६ ऑगस्ट २०२४ चा दिवस शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. कारण सरकारनं मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार राबवत असलेल्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात हे पाऊल उचलण्यात आले आहे. या पाऊलामुळे सरकारी तिजोरीवर ५.६ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची पिके काही कारणास्तव नष्ट झाली आहेत किंवा इतर काही महत्त्वाच्या कारणामुळे कर्जाची परतफेड करू शकले नाही. अशा शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करणार आहे. अशा स्थितीत या शेतकऱ्यांचे कर्ज आता सरकार फेडणार आहे. याचा सर्वाधिक फायदा लहान शेतकऱ्यांना होतो. त्यांना आगामी कापणीवर लक्ष केंद्रित करणे सोपे वाटते.
सध्या तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, तेलंगणा सरकार ५६४४.२४ कोटी रुपयांची पीक कर्जमाफी देत आहे.याअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातही सुमारे साडेचार लाख शेतकऱ्यांची तेवढीच कर्जमाफी होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.
Government announces loan waiver for farmers
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!