• Download App
    राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी नितीश कुमारांच्या मौनावर गिरीराज सिंह यांचा टोला, म्हणाले…Giriraj Singh comment on Nitish Kumar calm attitude regarding Rahul Gandhi disqualification

    राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी नितीश कुमारांच्या मौनावर गिरीराज सिंह यांचा टोला, म्हणाले…

    राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचाही घेतला आहे समाचार

    विशेष प्रतिनिधी

     पाटणा­ – बिहारमधील बेगुसराय येथील खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी रविवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी मौन बाळगल्याबद्दल टोला लगावला आहे. गिरीराज सिंह म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या अपात्रतेवर बाळगलेले “मौन” दर्शवते की जेडी(यू) नेते विरोधी गटाच्या नेतृत्वावर दावा करण्याच्या वाढत्या शक्यतांबद्दल आनंदी आहेत. Giriraj Singh comment on Nitish Kumar calm attitude regarding Rahul Gandhi disqualification

    याशिवाय गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्या ‘माझे नाव सावरकर नाही’ या वक्तव्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की,  सावरकर समजण्यासाठी  राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील.

    VIDEO : तसंही कुणीतरी म्हटलेलंच आहे, “ हर गांधी महात्मा नही होता” तेच खरं – भाजपाने लगावला टोला!

    काँग्रेसचे केरळच्या वायनाडमधील खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच,  राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कायद्यानुसार त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.  याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली जात आहे.

    Giriraj Singh comment on Nitish Kumar calm attitude regarding Rahul Gandhi disqualification

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!