• Download App
    ‘’नवी संसद भवन बांधले पाहिजे, हा काँग्रेसचाही विचार होता पण आता...’’ गुलाम नबी आझाद यांचं विधान! Ghulam Navi Azads reaction to the opposition boycott of the inauguration of the new parliament building

    ‘’नवी संसद भवन बांधले पाहिजे, हा काँग्रेसचाही विचार होता पण आता…’’ गुलाम नबी आझाद यांचं विधान!

    विरोधकांनी नव्या संसद  भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकल्यावरून केली आहे टिप्पणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली  : डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी संसदेच्या नवीन इमारतीबाबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. ते बुधवारी म्हणाले की, २६ वर्षांपूर्वी नरसिंह राव पंतप्रधान असताना शिवराज पाटील म्हणाले होते की, २०२६ पूर्वी नवीन आणि मोठे संसद भवन बांधले पाहिजे. Ghulam Navi Azads reaction to the opposition boycott of the inauguration of the new parliament building

    ते म्हणाले की, नवीन संसद भवन बांधण्याचा मुद्दा आहे, तर ही काही नवीन गोष्ट नाही. ३२ वर्षांपूर्वी काँग्रेसची हीच विचारसरणी होती. आता कोणी बहिष्कार टाकला किंवा उद्घाटन समारंभाला गेला नाही तर त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. कोणतेही सरकार असते तर संसदेची इमारत बांधावीच लागली असती. नवीन इमारत बांधणे गरजेचे होते आणि ती आता बांधली गेली हे चांगले आहे, असे ते म्हणाले.

    विरोधी पक्ष गोंधळात –

    २८ मे रोजी दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान संसद भवनाच्या बांधकामात योगदान देणाऱ्य कामगारांचाही सन्मान करणार आहेत. मात्र, त्यांच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला आहे. उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

    Ghulam Navi Azads reaction to the opposition boycott of the inauguration of the new parliament building

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार

    जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!