• Download App
    ‘’नवी संसद भवन बांधले पाहिजे, हा काँग्रेसचाही विचार होता पण आता...’’ गुलाम नबी आझाद यांचं विधान! Ghulam Navi Azads reaction to the opposition boycott of the inauguration of the new parliament building

    ‘’नवी संसद भवन बांधले पाहिजे, हा काँग्रेसचाही विचार होता पण आता…’’ गुलाम नबी आझाद यांचं विधान!

    विरोधकांनी नव्या संसद  भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकल्यावरून केली आहे टिप्पणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली  : डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी संसदेच्या नवीन इमारतीबाबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. ते बुधवारी म्हणाले की, २६ वर्षांपूर्वी नरसिंह राव पंतप्रधान असताना शिवराज पाटील म्हणाले होते की, २०२६ पूर्वी नवीन आणि मोठे संसद भवन बांधले पाहिजे. Ghulam Navi Azads reaction to the opposition boycott of the inauguration of the new parliament building

    ते म्हणाले की, नवीन संसद भवन बांधण्याचा मुद्दा आहे, तर ही काही नवीन गोष्ट नाही. ३२ वर्षांपूर्वी काँग्रेसची हीच विचारसरणी होती. आता कोणी बहिष्कार टाकला किंवा उद्घाटन समारंभाला गेला नाही तर त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. कोणतेही सरकार असते तर संसदेची इमारत बांधावीच लागली असती. नवीन इमारत बांधणे गरजेचे होते आणि ती आता बांधली गेली हे चांगले आहे, असे ते म्हणाले.

    विरोधी पक्ष गोंधळात –

    २८ मे रोजी दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान संसद भवनाच्या बांधकामात योगदान देणाऱ्य कामगारांचाही सन्मान करणार आहेत. मात्र, त्यांच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला आहे. उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

    Ghulam Navi Azads reaction to the opposition boycott of the inauguration of the new parliament building

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार