• Download App
    Jaishankarजयशंकर संसदेत म्हणाले- बांगलादेशात हिंदूंवर हल्ले ही चिंतेची बाब,

    Jaishankar : जयशंकर संसदेत म्हणाले- बांगलादेशात हिंदूंवर हल्ले ही चिंतेची बाब, आम्ही ढाका प्रशासनाच्या संपर्कात

    Jaishankar

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ( Jaishankar  )यांनी मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत बांगलादेशातील ताज्या परिस्थितीवर निवेदन दिले. ते म्हणाले की, शेजारी देश राजकीय संकटाचा सामना करत आहे. भारत सरकार तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

    जयशंकर पुढे म्हणाले की, बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत. तेथे हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. ही चिंतेची बाब आहे. आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ला केला, त्यानंतर परिस्थिती चिघळली. राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची परवानगी मागितल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर भारत सरकारने त्यांच्या आगमनाची व्यवस्था केली.



    परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, भारत सरकार बांगलादेशातील नागरिकांच्या संपर्कात आहे. सध्या तेथे सुमारे 19 हजार भारतीय उपस्थित आहेत, त्यापैकी 9000 विद्यार्थी आहेत. तेथे अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशात कोणतेही सरकार स्थापन झाले तरी भारतीय उच्चायुक्तांना संरक्षण मिळावे, अशी मागणी होत आहे.

    बांगलादेशच्या मुद्द्यावर जयशंकर काय म्हणाले…

    ढाक्याचे भारतीय उच्चायुक्त आणि चितगावचे सहयोगी उच्चायुक्त आम्हाला सातत्याने अहवाल पाठवत आहेत. आम्हाला बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेची चिंता आहे. गेल्या 24 तासांत तेथे बरेच काही बदलले आहे. हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. या विषयावर आम्हाला सभागृहाचे सहकार्य हवे आहे.

    बांगलादेश आपल्या खूप जवळ आहे. जानेवारीपासून तेथे तणाव आहे. बांगलादेशात जून-जुलैमध्ये हिंसाचार झाला. आम्ही तेथील राजकीय पक्षांच्या संपर्कात होतो. अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हा तिथला सर्वात चिंतेचा विषय आहे. शेख हसीना सध्या भारतात आहेत. आम्ही भारतीय समुदायाच्या संपर्कात आहोत. अनेक विद्यार्थी परतले आहेत. आम्ही आमच्या नागरिकांना सुरक्षा देऊ.

    Foreing Minister Jaishankar on Bangladesh Violence, Hindu Minority

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Govt : केंद्र सरकारने महागाई भत्ता 2% ने वाढवला; 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा

    Rahul Gandhi : राहुल गांधींवरील FIRचा स्वतःचाच आदेश हायकोर्ट जजनी बदलला; नोटीसशिवाय FIR योग्य मानले नाही;

    Meta : मेटाचा 8,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीचा प्लॅन:20 मेपासून; कर्मचारी कपात प्रक्रिया सुरू होईल; जागतिक स्तरावर 10% कर्मचारी कमी होतील