‘’चीनसोबत काय करार झाला ते सर्वांना सांगा’’ असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (२९ मे) मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, चीनच्या मुद्द्यावरून भारत सरकारला टोमणे मारताना त्यांना (राहुल गांधी) लाज वाटली पाहिजे. त्यांना (राहुल गांधी) चीनच्या राजदूताने सल्ला दिला आहे. Finance Minister Nirmala Sitharaman criticizes Congress leader Rahul Gandhi
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ते या मुद्यावर आमचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचेही ऐकत नाहीत. जेव्हा जेव्हा आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री संसदेत या विषयावर बोलतात, तेव्हा काँग्रेस नेते परराष्ट्रमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्यासाठी एकतर बाहेर पडतात किंवा मोठ्याने ओरडतात. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात निर्मला सीतारामन या सर्व गोष्टी सांगितल्या.
राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे –
मोदी सरकारच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना (राहुल गांधी) ५६ इंचांच्या छातीवरून टोमणा मारताना लाज वाटली पाहिजे, विशेषत: चीनसोबत त्यांनी कोणता करार केला हे कोणालाच माहीत नाही. ते म्हणाला की त्या करारात काय होते हे तुम्हाला, आम्हाला किंवा इतर कोणालाही माहिती नाही. ते चिनी लोकांशी केलेल्या व्यवहाराचा तपशील का देत नाही?
Finance Minister Nirmala Sitharaman criticizes Congress leader Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल चॅम्पियन चेन्नईवर पैशांचा पाऊस, गुजरातलाही मिळाले कोट्यवधी, पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी
- कर्नाटक विजयाची डोक्यात गेली हवा; मध्य प्रदेशात काँग्रेसला हव्यात 150 जागा!!
- हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अमित शाह दाखल; मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक!
- उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दोन्ही जागांवर विजय!