वृत्तसंस्था
चंदिगड : Farmers एमएसपीसह विविध मागण्यांसाठी दीर्घकाळ संपावर असलेल्या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी पायी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हरियाणामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणा पोलिस म्हणाले, शेतकऱ्यांना पुढे जाऊ दिले जाणार नाही. कारण दिल्लीत निदर्शने किंवा धरणे आंदोलनास परवानगी नाही. पंजाब सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलाच्या १५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नाकेबंदीसाठी लोखंडी व दगडी बॅरिकेड्स, काटेरी तार आणि धारदार खिळे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Farmers
भारतीय न्यायिक संहितेचे कलम १६३ (बीएनएस) हरियाणातील पाच जिल्ह्यांमध्ये (अंबाला, सिरसा, जिंद, कैथल, फतेहाबाद) लागू करण्यात आले आहे. या जिल्ह्यांचे आयजी आणि एसपी सीमेवर जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. दरम्यान, युनायटेड किसान मोर्चा (गैर-राजकीय) व किसान मजदूर मोर्चा (केएमएम) यांनी सांगितले की, १०१ शेतकऱ्यांचा एक गट शुक्रवारी दुपारी १ वाजता दिल्लीला रवाना होईल.
Farmers’ march to Delhi today; Administration will stop it, alert in Haryana over farmers’ protest
महत्वाच्या बातम्या
- CM फडणवीस म्हणाले- विरोधकांना माफी, हाच माझा बदला, माझी खलनायकासारखी प्रतिमा तयार केली, सर्व विसरून पुढे जाणार
- Ramtirth samiti : नाशिक मधून रामतीर्थ समितीच्या सदस्यांची फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थिती; राम काळपथ प्रकल्पात रामतीर्थासह विविध तीर्थांच्या विकासाची मागणी!!
- Devendra Fadnavis : कसोटी गती, दिशा आणि समन्वयाची; टेस्ट मॅच इनिंग फडणवीसांच्या नव्या सरकारची!!
- UPI Lite Wallet मर्यादा 5000 रुपयांपर्यंत वाढली, प्रति व्यवहार मर्यादा देखील वाढली