वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बुधवारी, 22 मे रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना आणि स्टार प्रचारकांना त्यांच्या भाषणात संयम ठेवण्यास, सावधगिरी बाळगण्यास आणि शिष्टाचार राखण्यास सांगितले.Election Commission notice to Nadda and Kharge; Appeal to the leaders not to make religious-caste statements, do not speak wrongly on the constitution
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते आपल्या भाषणात संविधान वाचवण्याचा आणि अग्निवीर योजनेचा वारंवार उल्लेख करत आहेत. तर भाजप नेते आपल्या भाषणात मुस्लिम आणि धर्मावर भर देत आहेत. आयोगाने दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि सांप्रदायिक विधाने करू नयेत असे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसला काय म्हटले?
समाजात फूट पडेल अशी प्रचार भाषणे थांबवावीत, असे भाजपला सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने काँग्रेसला संविधानाबाबत खोटी विधाने करू नये असे सांगितले. जसे की, भारतीय राज्यघटना रद्द केली जाऊ शकते किंवा विकली जाऊ शकते. याशिवाय, अग्निवीरवर बोलताना निवडणूक आयोगाने काँग्रेसला संरक्षण दलाचे राजकारण करू नका, असे सांगितले.
राहुल अग्निवीरवर म्हणाले होते- देशात दोन प्रकारचे सैनिक आहेत
राहुल गांधींनी लष्करावर केलेल्या वक्तव्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ 14 मे रोजी निवडणूक आयोगाकडे पोहोचले. राहुल 13 मे रोजी रायबरेलीमध्ये म्हणाले होते – मोदींनी दोन प्रकारचे सैनिक तयार केले आहेत. एक गरीब, मागास, आदिवासी आणि दलितांचा मुलगा आणि दुसरा श्रीमंत घराण्याचा मुलगा.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आयोगाचे कार्यालय गाठून राहुल आणि त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली. हा थेट सैनिकांवर हल्ला असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसला हा वादाचा मुद्दा बनवून सैनिकांचे मनोधैर्य खचवायचे आहे. हा निवडणुकीचा मुद्दा नसून राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. चीनपासून देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय लष्कर गांभीर्याने आपली संपूर्ण ताकद वापरत आहे.
जयशंकर म्हणाले- काँग्रेसने यापूर्वीही लष्करावर प्रश्न उपस्थित केले आहेत
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, काँग्रेसने भारतीय लष्करावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जेव्हा आमच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांना पुढे येण्यापासून रोखले होते आणि त्यांचा पाठलाग केला होता. त्यावेळीही राहुल गांधी यांनी भारतीय जवानांना मारहाण झाल्याचे संसदेत म्हटले होते. हे अपमान आपण पाहत आलो आहोत.
याआधीही जेव्हा जवानांनी बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले तेव्हा या लोकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते, जेव्हा आम्ही उरीमध्ये कारवाई केली तेव्हा या लोकांनी त्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. जयशंकर पुढे म्हणाले की, राजकीय कारणांमुळे आमच्या सैनिकांवर असे हल्ले देश खपवून घेणार नाही.
Election Commission notice to Nadda and Kharge; Appeal to the leaders not to make religious-caste statements, do not speak wrongly on the constitution
महत्वाच्या बातम्या
- अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, 4 आयसिस दहशतवादी पकडले, सर्व श्रीलंकेचे रहिवासी
- पीएम मोदी म्हणाले, भाजप अल्पसंख्याक विरोधात नाही; पण विशेष नागरिक कुणालाही मानणार नाही
- रईसींच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तासंघर्षाचा धोका; धर्मगुरू अन् लष्करात वर्चस्ववाद उफाळण्याची शक्यता
- सगळी मिथके तोडून भाजप दक्षिणेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरेल; पंतप्रधान मोदींना विश्वास!!