फॉर्म 17C हा कोणत्याही मतदान केंद्रावर झालेल्या एकूण मतांचा वैधानिक स्रोत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसने निवडणूक आयोग आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार यादीतून लोकांची नावे मनमानीपणे वगळण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. आता मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, महाराष्ट्रात मतदारांची नावे अनियंत्रितपणे जोडली किंवा काढली गेली नाहीत.
काँग्रेसला दिलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, संध्याकाळी ५ वाजताच्या मतदानाच्या आकडेवारीची अंतिम मतदानाच्या आकडेवारीशी तुलना करणे योग्य नाही. संध्याकाळी ५ ते ११.४५ या वेळेत मतदानात झालेली वाढ सामान्य आहे, हा मतदानाचा डेटा गोळा करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.
प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीत बदल करणे अशक्य असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले. कारण मतदानाचा तपशील देणारा वैधानिक फॉर्म 17C मतदानाच्या शेवटी मतदान केंद्रावर उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे उपलब्ध असतो.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, फॉर्म 17C हा कोणत्याही मतदान केंद्रावर झालेल्या एकूण मतांचा वैधानिक स्रोत आहे. त्यात सुधारणा करता येत नाही. मतदान केंद्रे बंद होण्यापूर्वी तो उमेदवारांना उपलब्ध करून दिली जाते, असेही आयोगाने सांगितले.
Election Commission gave a befitting reply to Congress allegations
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
- Bangladeshis : दिल्लीत अवैध बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन
- Pune book festival : वाचन प्रेमींकडून २५ लाख पुस्तकांची खरेदी ; ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल
- Kejriwal दिल्लीची निवडणूक जिंकली तरी केजरीवाल खुर्ची पासून दूरच; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा!!