विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खासदार चंद्रशेखर आझाद आधारित महिलांच्या इज्जतीशी खेळला. तो दलित आंदोलनाला कलंक आहे. त्याचा शेवट वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रखर शब्दांमध्ये डॉक्टर रोहिणी घावरी यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. आपल्या ट्विटर हँडल वरून डॉ. रोहिणी घावरी यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर अनेक आरोप केले. 2024 मध्ये देखील रोहिणी घावरी यांनी अशाच आशयाचे आरोप चंद्रशेखर आझाद यांच्यावर केले होते. रोहिणी घावरी काही वर्षे चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबर रिलेशनशिप मध्ये होत्या. Chandrashekhar Azad
रोहिणी धावरी या वाल्मिकी समाजातून येतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास केला असून स्वित्झरलँड मधून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातल्या परिसंवादांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
डॉ. रोहिणी घावरी काही वर्षे चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या. परंतु, या दरम्यान आझादने आपल्याला फसविले. तो विवाहित असल्याचे सांगितले देखील नाही. केवळ आपल्यालाच नाही, तर अनेक दलित महिलांना चंद्रशेखर आझादने फसविले. त्यांच्यावर अत्याचार केले, असा आरोप रोहिणी घावरी यांनी ट्विटर हँडल वर केला.
रोहिणी घावरी यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की :
महापुरुषांनी चालविलेल्या दलित आंदोलनात चंद्रशेखर आजादचे नाव यावे अशी त्याची लायकी नाही. गेल्या दहा वर्षांत त्याने दलित युवकांसाठी कुठलेही काम केलेले नाही. भाजपच्या कृपेने तो खासदार बनला, पण तो समाजाचा कधीही खरा नेता बनू शकला नाही. त्याचे खरे घृणास्पद चारित्र्य माझ्या एवढे कोणालाही माहिती नाही.
2027 च्या निवडणुकीत दलित आणि मुस्लिम यांची मते कापण्यासाठी भाजप चंद्रशेखर आझादचा वापर करून घेईल आणि नंतर त्याला फेकून देईल. त्याने मला जेवढी तकलीफ दिली आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट तकलीफ त्याला होईल. त्याने एका सच्चा महिलेचा छळ केलाय त्याची शिक्षा त्याला जरूर मिळेल. त्या दिवसाची मी वाट पाहात आहे.
Dr Rohini Ghavari targets MP Chandrashekhar Azad over his character
महत्वाच्या बातम्या
- नरेंदर – सरेंडर, थंडर – ब्लंडर : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले यशस्वी; काँग्रेस – भाजपने मात्र शाब्दिक खेळात अडकवली लढाई!!
- Yashwant Verma : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी मोठी घडामोड!
- Haridwar : हरिद्वार जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई ; दोन आयएए, एक पीसीएस अधिकारी निलंबित
- operation sindoor : भारताने पाकिस्तानातील २० नव्हे तर २८ ठिकाणे केली उद्ध्वस्त!