• Download App
    भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित, उत्तर प्रदेशातून 'या' दिग्गज नेत्याला दिली उमेदवारी! Dinesh Sharma declared candidature for Rajya Sabha seat from BJP

    भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित, उत्तर प्रदेशातून ‘या’ दिग्गज नेत्याला दिली उमेदवारी!

    भाजपचे ज्येष्ठ नेते हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी  भाजपाने उमेदवार जाहीर केला आहेा. भाजपाने उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.  Dinesh Sharma declared candidature for Rajya Sabha seat from BJP

    नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली होती आणि राज्यसभेसाठी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने दिनेश शर्मा यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

    भाजपचे ज्येष्ठ नेते हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी २६ जून रोजी दिल्लीत निधन झाले. आग्रा येथील रहिवासी असलेल्या हरिद्वार दुबे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

    निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिसूचनेनुसार, पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर आहे. 6 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून 8 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.

    Dinesh Sharma declared candidature for Rajya Sabha seat from BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!