विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशात एका दिवसांत १,०३,५५८ नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली. एका दिवसातील ही सर्वाधिक रूग्णवाढ आहे. कोरोनाचा कहर चरणसीमेला पोहोचल्याचे हे द्योतक मानले जाते. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. मागील वर्षी १७ सप्टेबर रोजी उच्चांकी ९७,८८९ बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली होती. Corona increases in whole country very fast
मागील वर्षी, बाधितांचा आकडा वीस हजारांवरून ९७,८८९ पर्यंत जाण्यास ७६ दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी फक्त पंचवीस दिवसांच्या अल्पकाळातच रूग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आकडेवारीनुसार, एकूण रूग्णसंख्येच्या ५.८९ टक्के इतकी सक्रिय रूग्णसंख्या असून बरे होण्याचा दर हा ९२.८० टक्के इतका आहे.
देशतील एकूण रूग्णसंख्या १,२५,८९,०६७ इतकी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. दिवसभरात ४७८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढून १,६५,१०१ इतकी झाली आहे.
देशातील एकूण १,६५,१०१ मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत तर, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पंजाब या राज्यांतही परिस्थिती चिंताजनक आहे.
Corona increases in whole country very fast
महत्त्वाची बातमी
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीएम येदियुरप्पांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती
- मोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा, 100 कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाची होणार CBI चौकशी
- मी एका पायावर बंगाल जिंकेन, दोन्ही पायांवर दिल्ली जिंकेन; ममता बॅनर्जींचा हुगळीच्या सभेत दावा
- नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरून मृतदेह आणि जखमी नक्षलवाद्यांना जंगलात नेलेय; नक्षलवाद्यांविरोधातील लढाई तीव्र करणार; अमित शहांची ग्वाही
- राफेल सौद्यातील ‘तो’ दलाल कोण? फ्रेंच मीडियाचा दावा – क्लायंट गिफ्टच्या नावावर झाला कोट्यवधींचा भ्रष्टाचार