• Download App
    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांचा भाजपात प्रवेशCongress veteran AK Antonys son Anil Antony joins BJP

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांचा भाजपात प्रवेश

    बीबीसीच्या माहितीपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर काँग्रेसपासून फारकत घेतली होती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. केरळमधील काँग्रेस नेते अनिल अँटनी यांनी २००२ची गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर जानेवारीमध्ये काँग्रेसपासून फारकत घेतली होती. भाजप नेते पीयूष गोयल, व्ही मुरलीधरन आणि पक्षाच्या केरळ युनिटचे प्रमुख के सुरेंद्रन यांनी आज एका औपचारिक कार्यक्रमात त्यांचे भाजपात स्वागत केले. Congress veteran AK Antonys son Anil Antony joins BJP


    “कविता कमी आणि इतिहास जास्त वाचा”; ज्योतिरादित्य शिंदे यांचा जयराम रमेश यांना टोला!


    अनिल अँटनी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे मत आहे की ते एका कुटुंबासाठी काम करत आहेत. पण माझे मत होते की मी काँग्रेससाठी काम करतोय.” ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भारताला जगात आघाडीवर आणण्याचा अत्यंत स्पष्ट दृष्टीकोन आहे.”

    याशिवाय, अनिल अँटनी म्हणाले, ‘’धर्म रक्षति रक्षत असा माझा विश्वासत आहे. आजकाल अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे एका कुटुंबासाठी काम करणे हा त्यांचा धर्म आहे, परंतु देशासाठी काम करणे हे माझे मत आहे. भारताला प्रसिद्ध बनवण्याची पंतप्रधानांकडे चांगली दृष्टी आहे. जे.पी.नड्डा, अमित शाह यांच्याकडे समाजात चांगले काम करण्याची इच्छाशक्ती आहे. देश मजबूत करण्यासाठी मी सुद्धा काम करेन.’’

    Congress veteran AK Antonys son Anil Antony joins BJP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल