विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 33 % महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर देशात प्रचंड आनंदाचे वातावरण असताना काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मात्र वेगळाच अजब दावा केला आहे. मोदी सरकारला म्हणे, देशाचे नाव बदलायचे होते, पण त्यांनी घाबरून अचानक महिला आरक्षण विधेयक म्हणून मंजूर करून घेतले, असा अजब दावा राहुल गांधींनी केला आहे. Congress MP Rahul Gandhi, however, made a different claim
राजस्थानात जयपूर मध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभ झाला. त्या समारंभा नंतर झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर तोफा डागल्या. पण त्यात त्यांनी वर उल्लेख केलेला अजब दावा केला.
राहुल गांधी म्हणाले, की मूळात मोदी सरकारला महिला आरक्षण आणायचेच नव्हते. देशाचे नाव बदलायचा त्यांचा डाव होता. पण भारतातले लोक हे स्वीकारणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अचानक महिला आरक्षण आणले. कारण संसदेचे विशेष अधिवेशन ते आधीच बोलवून बसले होते. अधिवेशनापासून माघार घेता येणे शक्य नव्हते. त्यामुळे मग त्यांनी अचानक महिला आरक्षण आणून ते संमत करून घेतले.
वास्तविक 33 % महिला आरक्षण ताबडतोब देता येणे शक्य आहे, पण त्यात मोदी सरकारने जनगणना आणि मतदारसंघांची फेररचना हे दोन मुद्दे अनावश्यक घातले. त्यामुळे आरक्षण 5 – 10 वर्षे पुढे ढकलले गेले. वास्तविक आरक्षण आत्ताच द्यायला हवे. त्यातही ओबीसींना त्या आरक्षणातून लाभ द्यायला हवा, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
Congress MP Rahul Gandhi, however, made a different claim
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, शाळांना सुटी जाहीर; अंबाझरीसह गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने घरांमध्ये शिरले पाणी
- JDS एनडीएत सहभागी; अमित शहांना भेटल्यानंतर कुमारस्वामींची घोषणा, म्हणाले- आमची कोणतीही मागणी नाही
- लालू, राबडी, तेजस्वीसह 17 जणांना समन्स; लँड फॉर जॉब्स प्रकरणात 4 ऑक्टोबरला हजर राहावे लागणार
- बिधूडीने फिजूल हुसका दी है मक्खी; उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाला ढकलले I.N.D.I आघाडीत!!