• Download App
    BJPs attack 'काँग्रेस नेत्यांची विधानं असंवेदनशील अन् निर्लज्जपणाची

    BJPs attack : ‘काँग्रेस नेत्यांची विधानं असंवेदनशील अन् निर्लज्जपणाची आहेत’, भाजपचा हल्लाबोल!

    BJPs attack

    राहुल गांधी आणि खरगेंवर निशाणा साधला


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : BJPs attack पहलगाम हल्ल्याबाबत काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांवरून भाजपने सोमवारी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना घेरले. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांच्या विधानांना असंवेदनशील आणि निर्लज्जपणाचे म्हटले.BJPs attack

    काही काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की लोकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या. रविशंकर प्रसाद म्हणाले की, एकीकडे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे पहलगाम हल्ल्यावर एकतेची चर्चा करतात, तर दुसरीकडे त्यांचे नेते अशी विधाने करत आहेत. राहुल गांधी आणि खरगे यांची विधाने केवळ औपचारिकता आहेत का?, असा सवाल प्रसाद यांनी केला.

    माजी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधान पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांकडून दाखवले जात आहे. जगभरातील देश भारतासोबत असताना, कर्नाटकसारख्या महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री असे विधान करत आहेत.

    रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, कर्नाटक काँग्रेस नेते आरबी तिम्मापूर आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या विधानांचा संदर्भ दिला आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे पक्षावर नियंत्रण नाही का? की दोघेही फक्त औपचारिकता करत आहेत आणि इतर नेत्यांना त्यांना वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य देत आहेत?

    Congress leaders’ statements are insensitive and shameless BJPs attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!

    Tahawwur Rana : तहव्वुर राणाच्या कोठडीत १२ दिवसांची वाढ, NIA न्यायालयाचा निर्णय

    Law Ministry : कायदा मंत्रालयाने म्हटले- सर्व मंत्रालयांनी वेळेवर कोर्टाचे उत्तर द्यावे, अवमानाची कारवाई टाळता येईल