• Download App
    दगडफेक करत अकाली दलाच्या कार्यक्रमात घुसखोरीचा कॉँग्रेस, आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सुखबिरसिंग बादल यांचा आरोप|Congress, AAP activists try to vandalise Akali Dal program by throwing stones, accused Sukhbir Singh Badal

    दगडफेक करत अकाली दलाच्या कार्यक्रमात घुसखोरीचा कॉँग्रेस, आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सुखबिरसिंग बादल यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड : शिरोमणी अकाली दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अकालीदलाचे प्रमुख सुखबिर सिंग बांदल यांनी केला आहे. घुसखोरांना पांगविण्यासाठी पोलिसांनी दंडुका आणि पाण्याच्या जोरदार फवाºयाचा वापर केला.Congress, AAP activists try to vandalise Akali Dal program by throwing stones, accused Sukhbir Singh Badal

    पंजाबमधील मोगा येथे आयोजित कार्यक्रमात शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबिर सिंग बादल भाषण करीत होते. त्यावेळी काही निदर्शकांनी पोलिसांशी झटापट केली, कठडे तोडले आणि जबरदस्तीने कार्यक्रमात घुसण्यासाठी दगडफेक केली. सुखबिर सिंग बादल पंजाबमधील १०० विधानसभा मतदारसंघात शंभर दिवसांच्या यात्रेवर निघाले आहेत.



    नी पत्रकारांना सांगितले की, निदर्शने करणारे शेतकरी नव्हते. परंतु, ते काँग्रेस आणि आम आदमी पाटीर्शी संबंधित होते. या घटनेत चार निदर्शक आणि तीन पोलीस जखमी झाले. पक्षाच्या रॅलीसाठी लावण्यात आलेले भव्य फलक आणि बॅनर फाडले. काही वाहनांचेही नुकसान झाले आहे.

    निदर्शकांना अनेकदा बजावनूही त्यांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याने बळाचा वापर करावा लागला, असे पोलीसांनी सांगितले. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली तसेच कार्यक्रम स्थळानजीकचा राष्ट्रीय महामार्गही रोखला, असे मोगाचे पोलीस अधीक्षक ध्रुनम निम्बाले यांनी सांगितले.

    Congress, AAP activists try to vandalise Akali Dal program by throwing stones, accused Sukhbir Singh Badal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे