• Download App
    Coal Crisis : सततच्या पावसामुळे झारखंड-बंगाल कोळसा खाणींमध्ये भरले पाणी, उत्पादनात ५० % घटीमुळे वीज संकट अधिक गडद। Coal Crisis Water filled in Jharkhands bengal coal mines due to heavy rain, production Drops to 50 percent

    Coal Crisis : सततच्या पावसामुळे झारखंड-बंगाल कोळसा खाणींमध्ये भरले पाणी, उत्पादनात ५० % घटीमुळे वीज संकट अधिक गडद

    गेल्या 3 दिवसांपासून झारखंड आणि बंगालच्या अनेक भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे देशातील कोळशाचे संकट गडद झाले आहे. मुसळधार पावसामुळे कोळशाच्या खाणींमध्ये पाणी भरले आहे. यामुळे कोळशाचे उत्पादन 50 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. पुन्हा एकदा विजेचे संकट तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे. कोळसा पुरवठ्यावरही 30 ते 40 टक्के परिणाम झाला आहे. कोळसा कंपन्यांच्या अधिकृत निवेदनानुसार, पावसामुळे झारखंड आणि बंगालमधील कोळसा खाणींमधून कोळसा काढणे कठीण होत आहे. Coal Crisis Water filled in Jharkhands bengal coal mines due to heavy rain, production Drops to 50 percent


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गेल्या 3 दिवसांपासून झारखंड आणि बंगालच्या अनेक भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे देशातील कोळशाचे संकट गडद झाले आहे. मुसळधार पावसामुळे कोळशाच्या खाणींमध्ये पाणी भरले आहे. यामुळे कोळशाचे उत्पादन 50 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. पुन्हा एकदा विजेचे संकट तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे. कोळसा पुरवठ्यावरही 30 ते 40 टक्के परिणाम झाला आहे. कोळसा कंपन्यांच्या अधिकृत निवेदनानुसार, पावसामुळे झारखंड आणि बंगालमधील कोळसा खाणींमधून कोळसा काढणे कठीण होत आहे.

    एचटीच्या वृत्तानुसार, बीसीसीएल, सीसीएल आणि ईसीएलच्या कोळसा खाणी पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झाल्या आहेत. बीसीसीएल आणि सीसीएलच्या खाणींमध्ये पावसामुळे खराब स्थिती आहे आणि उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. गेल्या 3 दिवसांत या खाणींमधून कोळशाचे नगण्य उत्पादन झाले आहे. झारखंडमधून देशातील सुमारे 11 राज्यांना कोळसा पुरवला जातो. त्यात पंजाब, हरियाणा, बंगाल, यूपी, बिहारसारखी प्रमुख राज्ये, राजधानी दिल्लीचे वीज प्रकल्प यांचा समावेश आहेत. पावसापूर्वी दुर्गापूजेच्या वेळीही कोळसा उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला होता. नवमी आणि दशमीच्या दिवशी अनेक भागात वाहतूक बंद झाल्यामुळे कोळसा राज्यांपर्यंत पोहोचू शकला नाही.



    कोल इंडियाकडे अजूनही 40 दशलक्ष टन साठा

    कोल इंडिया कम बीसीसीएलचे संचालक वित्त समीरन दत्ता यांनी म्हटले की, पावसामुळे काही कोळसा खाणींवर परिणाम झाला आहे. झारखंड आणि बंगालमध्ये परिस्थिती वाईट आहे, पण घाबरण्याची गरज नाही. ही केवळ कोळशाची कमतरता आहे, परंतु संकटाची परिस्थिती नाही. पाऊस थांबला की एका आठवड्यात वीज प्रकल्पांचा कोळसा साठा सुधारेल, असे आश्वासन त्यांनी दिले. कोल इंडियाकडे अजूनही 40 दशलक्ष टन कोळसा साठा आहे.

    दुसरीकडे, ईसीएलचे संचालक तंत्रज्ञान बी. बीरा रेड्डी म्हणाले की, सोमवारच्या पावसाचा ईसीएलच्या कोळसा उत्पादन आणि पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. झारखंड आणि ईसीएलच्या बंगालमधील सर्व खाणी प्रभावित झाल्या आहेत. अंदाजानुसार, 50 टक्के उत्पादनावर परिणाम झाला आहे.

    Coal Crisis Water filled in Jharkhands bengal coal mines due to heavy rain, production Drops to 50 percent

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र