• Download App
    सीएम शिवराज यांचा राहुल गांधीवर निशाणा, म्हणाले- तुमच्या खोट्यामुळे अनेकांनी घेतली नाही लस । CM Shivraj Singh Chauhan Criticizes Rahul Gandhi Over lies on Corona Vaccination

    सीएम शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले- तुमच्या खोटे बोलण्यामुळे अनेकांनी घेतली नाही लस!

    CM Shivraj Singh Chauhan : आज ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. पंतप्रधान मोदींनी सर्व लोकांना सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी लस घ्यावी व इतरांनाही प्रेरित केले पाहिजे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यासाठी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल केला. CM Shivraj Singh Chauhan Criticizes Rahul Gandhi Over lies on Corona Vaccination


    वृत्तसंस्था

    भोपाळ : आज ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. पंतप्रधान मोदींनी सर्व लोकांना सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी लस घ्यावी व इतरांनाही प्रेरित केले पाहिजे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यासाठी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

    मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, राहुल बाबा लाज वाटू द्या, लसीकरण पंतप्रधान नाही, तर तुम्ही राबवत आहात का? ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व लोकांना मोफत लस देण्याचा संकल्प केला आणि दुसरीकडे कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी काय करीत आहेत… ते संभ्रम पसरवत आहेत. राहुल गांधी लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत आणि लोकांचे जीवन धोक्यात घालत आहेत.

    मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी दुलारिया येथील गावकऱ्यांशी संवाद साधला आणि लसीसंदर्भात त्यांच्या मनात चालणार्‍या शंकांचे निराकरण केले.

    CM Shivraj Singh Chauhan Criticizes Rahul Gandhi Over lies on Corona Vaccination

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे