• Download App
    ममता बॅनर्जींची जादू ओसरली, TMCचे नेते बंगालला लुटत आहेत – काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा हल्लाबोल!CM Mamata Banerjees magic is fading away Adhir Ranjan Chowdhury WB Congress President

    ममता बॅनर्जींची जादू ओसरली, TMCचे नेते बंगालला लुटत आहेत – काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा हल्लाबोल!

    एकट्या पश्चिम बंगालमध्ये CBIकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या संपूर्ण भारतापेक्षा जास्त आहे.   

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या आमदाराला अटक आणि अनेक प्रकरणांच्या सीबीआय चौकशीच्या आदेशावरून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मंगळवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जींची जादू ओसरली आहे. आता तृणमूल काँग्रेस सोडून अनेक नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. खरगपूरमधील पापिया चक्रवर्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना पक्षात येण्याची गरज भासू लागली आहे. CM Mamata Banerjees magic is fading away Adhir Ranjan Chowdhury WB Congress President

    अधीर रंजन चौधरी म्हणाले, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू ओसरत चालली आहे आणि मोठ्या संख्येने लोक काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. काळाच्या ओघात ममता बॅनर्जींचे सर्व भ्रम दूर होईल. प्रत्येक जिल्हा (पश्चिम बंगाल) पीडित आहे आणि एकट्या पश्चिम बंगालमध्ये सीबीआयकडे प्रलंबित प्रकरणांची संख्या संपूर्ण भारतापेक्षा जास्त आहे. टीएमसी नेते पश्चिम बंगालच्या जनतेची लूट करत आहेत.’’

    अधीर रंजन चौधरी सतत ममता बॅनर्जींवर टीका करत आहेत आणि TMC भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप करत आहेत. दुसरीकडे, टीएमसीचे नेतेही काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, भाजपा आणि माकप यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही केला होता.

    CM Mamata Banerjees magic is fading away Adhir Ranjan Chowdhury WB Congress President

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य