• Download App
    'सनातन होता, सनातन आहे आणि राहणार' हिमंता सरमांचा राहुल गांधींवर हल्लाबोल Chief Minister Himanta Sarma criticizes Rahul Gandhi over Sanatan dispute

    ‘सनातन होता, सनातन आहे आणि राहणार’ हिमंता सरमांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

    (संग्रहित छायाचित्र)

    आज काँग्रेसने डाव्या आघाडीसोबत मिळून भारतात द्वेषाचे  वातावरण बनवले आहे

    विशेष प्रतिनिधी 

    पन्ना : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आता या निवडणुकीतही सनातनचा मुद्दा पुढे आला आहे. राज्यात रॅली काढताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हिमंता म्हणाले की, राहुल यांच्या पक्षाला सनातनला संपवायचे आहे. Chief Minister Himanta Sarma criticizes Rahul Gandhi over Sanatan dispute

    हिमंता सरमा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करताना म्हटले की, ”सनातनला कोणीही नष्ट करू शकत नाही. ते म्हणाले, मी राहुल गांधींना स्पष्ट सांगू इच्छितो  की सनातन होते, सनातन आहे आणि सनातन राहणार. सनातनचा जगभर प्रसार करायचा आहे, हे आता आपण सर्व हिंदूंनी ठरवायचे आहे.”

    मुख्यमंत्री हिमंता म्हणाले, ”राहुल गांधी म्हणतात की मी प्रेमाची दुकान चालवतो, तर मला सांगा  की ज्यावेळी  दिल्लीत शीखांचा कत्तल होत  होती,  त्यावेळी तुमचे प्रेमाचे दुकान कुठं होते.  आज काँग्रेसने डाव्या आघाडीसोबत मिळून भारतात द्वेषाचे  वातावरण बनवले आहे.”

    देशाचा विकास झाला आहे, देशाचा मान वाढला आहे असे ते म्हणाले. आज स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नाला अनुसरून आपला देश जागतिक नेता होण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या वेळी होत आहेत. मध्य प्रदेशच्या निवडणुकीनंतर ३-४ महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका होणार असून देशात काय घडणार आहे, याची पार्श्वभूमी मध्य प्रदेशच्या निवडणुकांमुळे निर्माण होणार आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे.

    Chief Minister Himanta Sarma criticizes Rahul Gandhi over Sanatan dispute

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Airlines : सीटवर अतिरिक्त शुल्क न आकारण्यावर विमान कंपन्यांचा विरोध; म्हटले- विमान भाडे वाढवावे लागेल

    TMC Manifesto : ममतांची घोषणा- SC-ST महिलांना दरमहा ₹1700, इतरांना ₹1500 मिळणार, जाहीरनाम्यात पक्क्या घरांचे आश्वासन

    Air India : एअर इंडियाने दिल्लीहून कॅनडाला चुकीचे विमान पाठवले; 7 तासांनंतर चीनच्या हवाई हद्दीतून परतले