• Download App
    |वाढत्या संसर्गावरून केंद्राचा राज्यांना पुन्हा इशारा, देशातील 27 जिल्ह्यांत कोरोना अनियंत्रितCenter warns states against rising contamination, uncontrolled corona in 27 districts of the country

    वाढत्या संसर्गावरून केंद्राचा राज्यांना पुन्हा इशारा, देशातील २७ जिल्ह्यांत कोरोना अनियंत्रित

    कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा अनियंत्रित होत आहे. परिस्थिती अशी आहे की 10 राज्यांतील 27 जिल्ह्यांत गेल्या दोन आठवड्यांत संसर्गाचे प्रमाण अचानक वाढले आहे. असे अनेक जिल्हे आहेत जिथे संसर्गाचे प्रमाण १० टक्क्यांच्या वर पोहोचले आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये ते पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे.Center warns states against rising contamination, uncontrolled corona in 27 districts of the country


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा अनियंत्रित होत आहे. परिस्थिती अशी आहे की 10 राज्यांतील 27 जिल्ह्यांत गेल्या दोन आठवड्यांत संसर्गाचे प्रमाण अचानक वाढले आहे. असे अनेक जिल्हे आहेत जिथे संसर्गाचे प्रमाण १० टक्क्यांच्या वर पोहोचले आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये ते पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे.

    अशा परिस्थितीत केंद्राने सर्व राज्यांना पत्र लिहून इशारा दिली आहे, तसेच संक्रमणाचे प्रमाण जास्त असलेल्या 27 जिल्ह्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या वतीने राज्यांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रात केंद्राकडून अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.



    आवश्यक ती सर्व पावले उचलण्यावर भर

    ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अनियंत्रित होत आहे, त्या जिल्ह्यांची निवड करून तेथे कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे या पत्रात म्हटले आहे. गरज भासल्यास रात्रीचा कर्फ्यू, लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी, लग्न किंवा इतर समारंभात गर्दीवर बंदी घालण्यासही सांगण्यात आले आहे.

    केंद्राच्या अहवालानुसार, मिझोराम, केरळ आणि सिक्कीम या तीन राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर १० टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. त्याच वेळी, सात राज्यांतील 19 जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे.

    आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, मिझोराममधील हन्नाथियाल आणि सेरछिप जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर अनुक्रमे 22.37 आणि 19.29 टक्के आहे. याशिवाय येथील इतर तीन जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर १० टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. याशिवाय केरळमधील दोन जिल्हे आणि सिक्कीममधील एका जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे.

    Center warns states against rising contamination, uncontrolled corona in 27 districts of the country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 21 लोकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी; 5 किमीपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज

    Rule Change Today: एलपीजी सिलिडर महागले… एटीएफच्या किमती वाढल्या, आजपासून देशभरात 5 मोठे बदल

    India GDP : तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ 7.8% राहिली; 50% ट्रम्प टॅरिफ असूनही अर्थव्यवस्था मजबूत