• Download App
    CDS Anil Chauhan भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली, युद्ध थांबवायची विनंती करणारा फोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला!!

    CDS Anil Chauhan : भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली, युद्ध थांबवायची विनंती करणारा फोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Operation Sindoor मध्ये भारतीय सैन्याची कारवाई एवढी अचूक आणि प्रखर होती, की भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली होती. युद्ध थांबवायची विनंती करणारा फोन पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स भारतीय अधिकाऱ्याला केला, अशा शब्दांमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS जनरल अनिल चौहान यांनी inside story सांगितली.

    सीडीएस अनिल चौहान यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि स्ट्रॅटेजिक अभ्यास या विभागातर्फे आयोजित फ्यूचर वॉर्स अँड वॉरफेअर या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपले काय नुकसान झाले हे महत्वाचे नाही. आपण काय आणि कसा प्रतिकार केला, हे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करून सांगितले.

    CDS जनरल अनिल चौहान म्हणाले :

    आपण भविष्याचा विचार करतो त्यावेळी भूतकाळाकडे पाहावे लागते. भूतकाळाकडून आपण काही शिकत असतो. कोणत्याही युद्धात दोन घटक असतात, हिंसा आणि हिंसेमागील राजकारण. राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो. युद्धात चार घटक महत्वाचे असतात. युद्ध लढणारे , ग्राउंड काम करणारे , तंत्रज्ञान , लोकांच्या इमोशन महत्वाच्या असतात. त्या खूप मदत करतात.

    इमोशन, चान्स आणि कारण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑपरेशन सिंदुरमध्ये पाहायला मिळाल्या. पहलगाम मध्ये झालेला हल्ला आपण पहिला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्माच्या नावावर लोकांना मारले. भारत हा कायम दहशत वादाच्या विरोधात आहे. लोकांची भावना होती की बदला घ्या आणि न्याय द्या. भारतीय सैन्य दलाने ते केले.

    पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या पाहिजेत पण ते त्या थांबवत नाहीत. ते सतत अणुबॉम्बची धमकी देतात. पण भारताच्या पुढे हरतात. मिलिटरी ऑपरेशन्स अविश्वसनीय असतात. प्रत्येक ऑपरेशन मध्ये रिस्क असते आपली क्षमता याचा विचार करावा लागतो. भारताची क्षमता आता वाढली आहे. कोणताही देश आपल्या जुन्या क्षमतांचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करत असतो. आपण उरी सर्जिकेल स्ट्राइक केला ही आपल्या हवाई दलाची क्षमता आहे. आपल्याकडे न्यू ड्रोन सिस्टम आहे.

    1965 मध्ये भुट्टोने सांगितलं होते, पाकिस्तान भारताशी 1000 वर्षे युद्ध करेल. पण ते युद्ध पाकिस्तानला 13 दिवसांत संपवावे लागले. जनरल असीम मुनीर यांनी पहलगाम बाबत वक्तव्य केले. भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानला स्वतःचे जास्त नुकसान करून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांनी टेलिफोनवरून युद्ध थांबविण्याचे विनंती केली. अवघ्या 8 मिनिटात आपण त्यांचे दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी आपण हल्ला केला. 48 तासांची लढाई भारताने आठ तासांमध्ये संपवली.

    युद्धासाठी 5 गोष्टी महत्वाच्या असतात, असंही ते म्हणाले. कॉर्पोरेशन, कॉम्पिटिशन, कन्फ्रटेशन,कॉन्फ्लिक्ट आणि कॉम्बॅट याचा समावेश असतो.

    भविष्यात इनफार्मेशन वॉर वर काम केल पाहिजे. आपण पाकिस्तानवर हल्ला करत असताना अचूक हल्ला केला. युद्धासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलजी काय करत असतात. सेन्सर टेक्नॉलॉजी, सगळ्या ठिकाणी आपल्याला ते डिप्लॉय करावे लागेल. हायपरसॉनिक टेक्नलॉजी जे आपल्याकडे ब्राह्मोस आहे , छोटे ड्रोन , रडार यंत्रना सगळ्या गोष्टी यात आहेत.



    रोबोटिक्स आणि ऑटोमेशन

    आधी माणूस आणि माणसात युद्ध व्हायच आता मशीन आणि मशीनमध्ये होत आहे त्यासाठी टेक्नोलॉजी महत्वाची आहे. स्पेस ,साइबर यामध्ये भविष्यात महत्वाच्या आहेत
    डेटा सेंट्रिक आणि रिमोट युद्ध होऊ शकतं, असं अनिल चौहान म्हणाले.

    टॅक्टिक आणि स्ट्रेटेजी हा चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे. भविष्यातला युद्धाची स्थिती पाहता आपण आपल्यात बदल करतोय.आपलं काय नुकसान झालं हे महत्वाचं नाही. मात्र आपण काय प्रतिकार केला हे महत्वाचे आहे.

    आपण पाकिस्तानवर असा खोलवर हल्ला केला की त्यांना कळला नाही. सरगोधा, जाकोबाबाद, इथे हल्ला झाल्यावर त्यांना कळालं. पाकिस्तानला अजून नुकसान करून घ्यायचं नव्हत म्हणून त्यांनी कॉल केला. भविष्यात युद्धात AI चा वापर होऊ शकतो.

    पाकिस्तानचे नेमके नुकसान किती हे लवकरच सांगू

    डावानं जिंकतो त्यावेळी विकेट महत्त्वाच्या नसतात…जेव्हा मला विचारलं जातं की आपलं किती नुकसान झालं, तेव्हा मी म्हणतो ते महत्त्वाचं नाही. निकाल महत्त्वाचा असून तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचं आहे. नुकसानासंदर्भात बोलणं योग्य होणार नाही. मात्र, जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये कसोटी मॅच खेळत असता आणि डावानं जिंकता त्यावेळी किती विकेट गेल्या, किती बॉल आणि किती फलंदाज बाद झाले हे महत्त्वाचं नसतं. तांत्रिक निकषांनुसार आम्ही यासंदर्भातील विशिष्ट डेटा तुमच्यासोबत शेअर करु, असं अनिल चौहान म्हणाले. आम्ही तुम्हाला सांगू शकतो आम्ही किती विमानं नष्ट केली, किती रडार नष्ट केले. आम्ही एक ढोबळ परीक्षण करत आहोत लवकरच माहिती देऊ, असं सीडीएस अनिल चौहान म्हणाले.

    CDS Anil Chauhan: India ended a 48-hour battle in eight hours

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Putin told Trump : दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती निवडणुकीत लिबरल पक्षाचा विजय; ली जे-म्युंग होणार नवे राष्ट्रपती

    Mujibur Rahman : मुजीबुर रहमान आता बांगलादेशचे राष्ट्रपिता नाहीत; स्वातंत्र्यसैनिकाची व्याख्याही बदलली

    Kamal Haasan : तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व! कमल हसन यांचा कन्नड भाषेबाबत माफी मागण्यास ठाम नकार