• Download App
    नेहरूंनी चीनला केलेल्या मदतीचा दाखला देत भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा; सुधांशु त्रिवेदी म्हणाले... BJP targets Rahul Gandhi citing Nehrus help to China BJP spokesperson Sudhanshu Trivedi

    नेहरूंनी चीनला केलेल्या मदतीचा दाखला देत भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा; सुधांशु त्रिवेदी म्हणाले…

    …त्यावर काँग्रेस का बोलत नाही? असा सवाल भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी विचारला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे त्यांच्या विविध वक्तव्यांवरून कायमच भाजपच्या निशाण्यावर राहतात. आता भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींच्या चीनबाबतच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. सुधांशू यांनी आरोप केला की, जेव्हा चिनी सैन्य उपासमारीने मरत होते, तेव्हा माजी पंतप्रधान नेहरूंनी तांदूळ दिला होता. त्यावर काँग्रेस का बोलत नाही? BJP targets Rahul Gandhi citing Nehrus help to China BJP spokesperson Sudhanshu Trivedi

    सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, ‘राहुल गांधी यांनी चीनबाबत निराधार विधाने केली आहेत. काँग्रेस सरकारचे चीनशी काय संबंध होते आणि भाजप सरकारचे संबंध कसे आहेत, हे आम्हाला स्पष्ट करायचे आहे. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून चीन राजनैतिकदृष्ट्या एकाकी पडला आहे. राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल करताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, ‘राहुल गांधींना चीन संबंधीच्या गोष्टींमध्ये इतका रस  का ? राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या देणगीमुळे किंवा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी केलेल्या करारामुळे ते वारंवार भारत सरकारशी भांडतात.

    पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या काळात चिनी सैन्याला अन्न आणि रसद पुरवल्याचा मोठा आरोप सुधांशू त्रिवेदी यांनी केला. 21 जून 1952 च्या पत्रकार परिषदेचा हवाला देत सुधांशू म्हणाले की, ‘एका पत्रकाराने नेहरूंना चीनला तांदूळ देण्याबाबत विचारले. यावर नेहरू म्हणाले – चीनमध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात पाठवला गेला नाही. विशेष बाब असल्याने आम्ही कमी प्रमाणात तांदूळ पाठवला आहे. हा तांदूळ चिनी सैन्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही मदत करत आहोत.

    सुधांशू त्रिवेदी यांनी आरोप केला की, ‘जेव्हा चिनी सैन्य तिबेटमध्ये अत्याचार करत होते, तेव्हा चिनी सैन्य उपासमारीने मरत होते. मग नेहरूंनी तांदूळ दिला आणि साडेतीन हजार टन तांदूळ पोहोचला. चीन लडाखमधील भारतीय भूभाग बळकावत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी  केला होता. ते म्हणाले होते- ‘लडाख हे मोक्याचे ठिकाण आहे आणि एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की चीनने भारताची जमीन हिसकावून घेतली आहे. विरोधकांच्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, लडाखचा एक इंचही भाग चीनने घेतला नाही, पण हे खोटे आहे.

    BJP targets Rahul Gandhi citing Nehrus help to China BJP spokesperson Sudhanshu Trivedi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!