• Download App
    Mamata Banerjee सिंदूर वाटप करणार नसल्याचे भाजपकडून स्पष्ट पण फेक न्यूजवर ममता बॅनर्जींचा राजकारणाचा खेळ उघड

    Mamata Banerjee सिंदूर वाटप करणार नसल्याचे भाजपकडून स्पष्ट पण फेक न्यूजवर ममता बॅनर्जींचा राजकारणाचा खेळ उघड

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजपकडून सुरू होणाऱ्या जनसंपर्क अभियानासंदर्भात काही माध्यमांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दैनिक भास्कर आणि झी न्यूज या माध्यमांनी अशी बातमी दिली होती की भाजप ९ जूनपासून ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवत महिलांना सिंदूर वाटणार आहे. मात्र, भाजपने हे वृत्त फेटाळले असून ही केवळ बनावट बातमी असून विरोधक ती वापरून खोटं राजकारण करत आहेत, अशी स्पष्टोक्ती केली आहे. Mamata Banerjee

    भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालव्यांनी या बातमीला थेट ‘#FakeNews’ अशी शिक्कामोर्तब करत सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले, “दैनिक भास्करने कोणत्याही अधिकृत स्रोताशिवाय ही बातमी दिली आहे. ही जनतेची दिशाभूल आहे.

    या खोट्या बातमीच्या आधारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त आणि अशोभनीय टीका केली. त्यांनी म्हटले, “मोदी काय सगळ्यांचे पती आहे का? आधी आपल्या पत्नीला सिंदूर द्या!” असे बेताल वक्तव्य केले. Mamata Banerjee

    मालवीय यांनी ममतांच्या वक्तव्यावर टीका करत म्हटले, “जेव्हा एखादी मुख्यमंत्री अधिकृत व्यासपीठावरून फेक न्यूजच्या आधारावर पंतप्रधानांवर वैयक्तिक आणि धार्मिक प्रतीकांचा वापर करून टीका करतात, तेव्हा तो राजकारणातील अधःपतनाचा गंभीर मुद्दा ठरतो.”

    ममता बॅनर्जी यांनी केवळ सिंदूरच्या मुद्द्यावरच नव्हे, तर पंतप्रधानांनी परदेशात न जाता देशात फिरत असल्याची टीकाही केली. यावर प्रत्युत्तर देताना मालवीय यांनी विचारले, “देशाच्या संरक्षणासाठी लष्करी कारवाया सुरू असताना, शेजारी देशांकडून दहशतवादी कुरापती सुरू असताना, पंतप्रधान देशात जनतेशी संवाद साधत असतील तर त्यात चुकीचे काय आहे? ममतांनी आपल्या राज्यात सुरू असलेल्या साम्प्रदायिक तणावाकडे लक्ष द्यावे.”

    काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाथ यांनीही या फेक न्यूजवर प्रतिक्रिया देताना भाजपच्या अभियानावर टीका केली. यावर मालव्यांनी स्पष्ट केले की, “या लोकांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही. यांचं कामच आहे अफवा पसरवणं आणि पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका करणं.”

    भाजपने स्पष्ट केलं आहे की, ९ जूनपासून सुरू होणाऱ्या संपर्क मोहिमेचा उद्देश म्हणजे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात जनतेपर्यंत पोहोचणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि सरकारच्या यशस्वी योजनांची माहिती देणे. “कोणत्याही धार्मिक चिन्हांचा वापर करून राजकारण करणे भाजपच्या संस्कृतीत नाही,” असे सांगत भाजपने विरोधकांना आव्हान दिले की ते विकासाच्या मुद्यावर चर्चा करावी.

    BJP makes it clear that it will not distribute vermilion, but Mamata Banerjee’s political game on fake news is exposed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    200 कोटींच्या डिजिटल टोळीच्या प्रमुखाला सुरतेत अटक; एकाच खात्यातून एका दिवसात 42 कोटींच्या व्यवहारानंतर पर्दाफाश

    नोबेल पुरस्कार विजेत्याचा हिंसक चेहरा; शेख हसीनांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा घातक इरादा!!

    Kejriwal : केजरीवाल सोनीपत न्यायालयात अनुपस्थित; दिल्लीचे वकीलही पोहोचले नाहीत, ऑक्टोबरमध्ये सुनावणी