• Download App
    कोरोना विषााणूला भारतीय म्हणून देशाची प्रतिमा मलिन, शशी थरुर यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची भाजप नेत्याची मागणी|BJP leader demands cancellation of Lok Sabha membership of Shashi Tharoor

    कोरोना विषााणूला भारतीय म्हणून देशाची प्रतिमा मलिन, शशी थरुर यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची भाजप नेत्याची मागणी

    कोरोना विषाणूला भारतीय व्हेरिएंट म्हणणारे खासदार शशी थरुर यांनी देशाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे.BJP leader demands cancellation of Lok Sabha membership of Shashi Tharoor


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना विषाणूला भारतीय व्हेरिएंट म्हणणारे खासदार शशी थरुर यांनी देशाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे.

    काँग्रेस खासदार आणि आयटी समितीचे सदस्य असलेल्या शशी थरूर यांना आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यंनी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा सभापती ओम बिरला यांना पत्र लिहीले आहे.



    घटनेतील दहाव्या अनुसूचीतील नियमांचा संदर्भ त्यांनी दिला आहे.दुबे यांनी म्हटले आहे की, शशी थरूर यांच्यामुळे संसद आणि भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. करोना विषाणूच्या व्हेरियंटला भारताचं नाव ते वारंवार देत आहेत.

    जागतिक आरोग्य संघटनेनं याचं नाव इ.1.617 असं दिलं आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे भारताची प्रतिमा डागाळत आहे. भारत सरकारने या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे.

    असं असूनही थरून वारंवार या शब्दाचा वापर करताना दिसत आहेत.वर कराम करत असल्याचा आरोप करून निशिकांत दुबे म्हणाले, टूलकिटप्रकरणी आयटी मंत्रालयाकडून ते स्पष्टीकरण मागत आहे.

    ट्विटर देशाविरोधात कारवाई करत असताना स्पष्टीकरण मागणं चुकीचं आहे. हे प्रकरण तपास यंत्रणांकडे आहे. आयटी समिती सरकारच्या कारवाईत दखल देऊ शकत नाही.

    BJP leader demands cancellation of Lok Sabha membership of Shashi Tharoor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे