वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमध्ये एनडीएशी फारकत घेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले नवे महाआघाडी सरकार आज विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करणार आहे. आज बुधवारी बिहार विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या विशेष अधिवेशनादरम्यान आज सभागृहात जेडीयू-आरजेडी युतीला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.Bihar Floor Test Bihar’s grand alliance government’s real test today, controversy from assembly speaker even before the floor test
सध्या विधानसभेचे अध्यक्ष विजय सिन्हा यांनी आपले पद सोडण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत बिहार विधानसभेच्या विशेष अधिवेशनात चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र, बिहार विधानसभेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आला आहे. अशा परिस्थितीत विधानसभेचे अध्यक्ष विजय सिन्हा यांनी हे नियम आणि तरतुदीच्या विरोधात असल्याचे सांगितले आहे. बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय सिन्हा हे भाजपचे आमदार आहेत.
नैतिकतेच्या आधारावर अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
त्याचवेळी जेडीयूच्या तिकिटावर आमदार झालेले बिहार विधानसभेचे उपाध्यक्ष महेश्वर हजारी म्हणतात की, अविश्वास प्रस्ताव सभापतींच्या विरोधात आला आहे, अशा परिस्थितीत उपाध्यक्षांना काम करावे लागेल. महेश्वर हजारी यांच्या मते, विजय सिन्हा यांनी नैतिकता आणि बहुमताचा मान राखून आपले पद सोडावे.
नितीश कुमारांकडे 164 आमदार
बिहारच्या 243 जागांच्या विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी 122 आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनाकडे सध्या 164 आमदार आहेत. जो फ्लोअर टेस्टमध्ये आपले बहुमत सहज सिद्ध करू शकतो. दुसरीकडे, अविश्वास प्रस्तावानंतर विजय सिन्हा यांना सभापतीपदी राहण्यासाठी बहुमताची गरज भासणार असली तरी भाजपकडे केवळ 77 आमदार आहेत.
सध्या विधानसभा सचिवांना 10 ऑगस्ट रोजी महाआघाडीच्या आमदारांनी सभापती विजय सिन्हा यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. दरम्यान, आता आरजेडीचे ज्येष्ठ नेते अवध बिहारी चौधरी विधानसभेचे नवे अध्यक्ष असू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. दुसरीकडे, जेडीयूचे देवेशचंद्र ठाकूर यांना विधान परिषदेचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते.
Bihar Floor Test Bihar’s grand alliance government’s real test today, controversy from assembly speaker even before the floor test
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका आरोग्य सेविकांच्या मानधनात मोठी वाढ!!
- भारत – चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील 500 गावांचे मोदी सरकार करणार पुनर्वसन!!
- बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्यातुरुंगवासासंबंधीचा कायदा रद्द, पूर्वलक्षी प्रभावाने जप्तीची कारवाई नाही
- काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी राजकीय कार्यक्रमांपूर्वी सोनिया, राहुल, प्रियांका यांचा एकत्र परदेश दौरा