• Download App
    भूकंप : आसाममध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, बंगाल-बिहारमध्येही दहशतीचे वातावरण । Big earthquake Hits Assam, magnitude of 6.4 on the Richter Scale today

    भूकंप : आसाममध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, बंगाल-बिहारमध्येही दहशतीचे वातावरण

    Big earthquake Hits Assam : बुधवारी (28 एप्रिल) सकाळी आसामच्या गुवाहाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर तेजपूर आणि सोनितपूरमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 6.4 तीव्रतेचे होते. या काळात लोक घाबरून घराबाहेर पडले होते. Big earthquake Hits Assam, magnitude of 6.4 on the Richter Scale today


    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : बुधवारी (28 एप्रिल) सकाळी आसामच्या गुवाहाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर तेजपूर आणि सोनितपूरमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 6.4 तीव्रतेचे होते. या काळात लोक घाबरून घराबाहेर पडले होते.

    नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7:51 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी सोनितपूरमध्ये 6.4 तीव्रता नोंदवण्यात आली. गुवाहाटी आणि तेजपूरमध्येही भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची माहिती मिळताच लोकांमध्ये दहशत पसरली. ते आपापल्या घरातून बाहेर आले. यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.

    घरांची पडझड, मोठे नुकसान

    तीव्र भूकंपामुळे अनेक भागांत भिंती कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी झाडेही कोसळली. भूकंपामुळे बरेच नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय उत्तर बंगाल आणि बिहारमधील काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

    आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भूकंपाच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा, अशी मी प्रार्थना करतो. तसेच, मी सर्व लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करतो. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून भूकंपाविषयी माहिती गोळा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Big earthquake Hits Assam, magnitude of 6.4 on the Richter Scale today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार