विशेष प्रतिनिधी
मुंबई: कॉँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांचा पुळका आलेल्या शिवसेनेने कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांवर शरसंधान केले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली आहे. जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरावर मालकी हक्क सांगून त्या वाड्यातच ते पथारी पसरून बसले आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.Because of Rahul Gandhis fascination Shivsena criticises old congress leaders
राहुल गांधी वाड्याची डागडुजी करु इच्छितात. वाड्यात रंगरंगोटी करु पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात. पण जुने लोक राहुल गांधींना ते करु देत नाहीत. राहुल गांधी रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे, असे म्हणत शिवसेनेने कॉँग्रेसला शहाणपणाचे बोलही सुनावले आहेत.
काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे.
सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे.
पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपºया बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात,’ अशी शक्यता शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय? अशा शब्दांत कॉँग्रेसला शिवसेनेने सुनावलेही आहे.
Because of Rahul Gandhis fascination Shivsena criticises old congress leaders
महत्त्वाच्या बातम्या
- आता यूकेहून येणाऱ्या लोकांना 10 दिवस अलग ठेवणे आवश्यक , आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवणे देखील आवश्यक
- अमित ठाकरे यांचा मुंबईच्या खड्डयांमुळे लोकलचा प्रवास मुंबईतील खड्डे बुजविण्यात शिवसेनेला अपयश
- नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय नौदल भरती
- अगोदर शेतकऱ्यांना तातडीची मदत करा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी