विशेष प्रतिनिधी
पुणे : Thank God सध्याच्या या अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहे, असे उद्गार उद्योगपती बाबा कल्याणी यांनी काढले. त्यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. बाबा कल्याणींच्या वक्तव्यातून अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपतींशी आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधतात. त्यावेळी ते विज्ञान तंत्रज्ञान, स्ट्रॅटेजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे मुद्द्यांवर बोलतात. आपण पंतप्रधान मोदींशी अनेकदा संवाद साधलात. आपला काय अनुभव होता??, असा सवाल मुलाखतकर्तीने बाबा कल्याणींना विचारला.
- CM Fadnavis : कोणताही निधी बेकायदेशीर वळवलेला नाही, लाडकी बहीणवरून मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
त्यावेळी बाबा कल्याणी उत्स्फूर्तपणे उद्गारले, Thank God सध्याच्या अडचणीच्या आणि आव्हानाच्या काळात नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान भारताला लाभलेत. त्यांच्या ऐवजी दुसऱ्या कुणा व्यक्तीचा पंतप्रधान म्हणून मी विचारही करू शकत नाही. पंतप्रधान मोदींची परिस्थितीची जाणीव आणि जानकारी अफलातून आहे. जागतिक राजकारणामध्ये आपल्या देशाच्या भोवती नेमके कुठे काय घडते आहे, हे त्यांना उत्तम समजते. त्यानुसारच ते स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवून वाटचाल करतात. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत ते सर्वोत्तम पंतप्रधान आहेत!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत संरक्षण क्षेत्राची वाढ करण्याकडे सरकारने विशेषत्वाने लक्ष दिले. एकेकाळी सर्व संरक्षण सामग्री आयात करणाऱ्या भारताची संरक्षण सामग्रीची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारतीय कंपन्यांच्या संशोधन आणि उत्पादन क्षमतेची प्रचिती सगळ्या जगाला आली. या पार्श्वभूमीवर बाबा कल्याणी यांनी वर उल्लेख केलेले उद्गार काढले. त्यांना विशेष महत्त्व आले.
Baba Kalyani shares his thoughts on India’s path ahead and how PM Modi
महत्वाच्या बातम्या
- Wajahat Khan : शर्मिष्ठा पनोली प्रकरणातील फिर्यादीच निघाला हिंदूविरोधी, तक्रार दाखल करणाऱ्या वजाहत खानला हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह पोस्ट
- Mohd Yunus ढाक्यामध्ये लोकशाही वाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घालून नोबेल पुरस्कार विजेता राज्यकर्ता harmony award घेण्यासाठी गेला लंडनला!!
- आता RCBने चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात घेतली धाव
- Sarsanghchalak : सरसंघचालकांची स्वयंसेवकांशी पंच परिवर्तनावर चर्चा, संघाचे साहित्य प्रत्येक घरात पोहोचवण्यावर भर