वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत भारतीय नौदलाने देखील अतुलनीय योगदान दिले असून 39 युद्धनौकांना पैकी 37 युद्धनौका आणि आणि पाणबुड्या यांची निर्मिती भारतातल्या विविध डॉकयार्डमध्ये करण्यात आली आहे, अशी महत्वपूर्ण माहिती नवे नौदल प्रमुख एडमिरल हरि कुमार यांनी दिली आहे. Atmanirbhar bharat; Indian Navy contributed a lot, most war ships are made in India
भारताच्या उत्तर सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि कोरोनाच्या लाटा यामुळे जी मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नौदलाने पूर्ण तयारी केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी नौदलाच्या वैद्यकीय विभागाने किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत कोविड सेंटर्स देखील उभारली आहेत, याची माहिती ॲडमिरल हरि कुमार यांनी दिली आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेत यापुढे देखील नौदलाचे योगदान अधिक राहील. नौदलाला आवश्यक असणारी सर्व सामग्री भारतातच निर्मित केली जाईल. आवश्यक ती आर्थिक आणि तांत्रिक गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान अपडेट करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ यासाठी मोठी गुंतवणूक नौदल करणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय नौदलाला तंत्रज्ञान दृष्ट्या देखील आत्मनिर्भर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे ॲडमिरल हरि कुमार म्हणाले.
Atmanirbhar bharat; Indian Navy contributed a lot, most war ships are made in India
महत्त्वाच्या बातम्या
- GREAT GADKARI : आऊट ऑफ बॉक्स संकल्पना ! शहरांमधील सांडपाणी- घनकचरा वापरून तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालणार बस-ट्रक-कार
- महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह सात राज्यांना झायडस कॅडिलाची जायकोव्ह-डी लस मिळणार ; सध्या प्राधान्याने प्रौढ नागरिकांना लस देणार
- कतरिना, विकीचे शुभमंगल केव्हा लागणार ? चाहत्यांसह पाहुण्यांमध्ये मोठी उत्सुकता
- हेल्मेट घालून लालपरी चालविली; एसटी संपामुळे दुखापत टाळण्यासाठी चालकाची अनोखी युक्ती