• Download App
    Assam भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन बांगलादेशींना आसाम पोलिसांनी पकडले

    Assam : भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन बांगलादेशींना आसाम पोलिसांनी पकडले

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : बांगलादेशातील शेख हसीना सरकारची राजकीय सत्ता उलथून टाकल्यानंतर बांगलादेशींचे भारतात घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने वाढत आहेत. आता आसाम पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक करून शेजारच्या देशाच्या ताब्यात दिले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली आहे. हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी माहिती दिली की आसाम पोलिसांनी काल रात्री त्रिपुरातून भारतात प्रवेश केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले. मोहम्मद अबू शैद, असदुल इस्लाम आणि मोहम्मद सरवर अशी घुसखोर बांगलादेशींची नावे आहेत. त्रिपुराच्या आंतरराज्य सीमेवरून आसामच्या करीमगंज जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात हे लोक पकडले गेले.


    Badlapur Case : संतप्त पालकांनी शाळा फोडली; पोलिसांवर दगडफेक; बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT गठीत!!


    बांगलादेशी घुसखोरांपैकी एकाचे आधार कार्डही सापडले असून तो दुसऱ्यांदा भारतात दाखल झाल्याचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी म्हटले आहे. तिन्ही बांगलादेशींचा हेतू भारतात घुसखोरी करून चेन्नईला जाण्याचा होता. सर्व घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले आहे.

    यापूर्वी सोमवारीही धुबरी येथे एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले होते. या महिलेने दावा केला आहे की ती 15 जणांसह बांगलादेश सोडून सीमेच्या दोन्ही बाजूने दोन दलालांच्या मदतीने भारतात दाखल झाली होती. महिलेला तिच्या देशाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Assam Police arrested three Bangladeshis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Govt : केंद्र सरकारने महागाई भत्ता 2% ने वाढवला; 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा

    Rahul Gandhi : राहुल गांधींवरील FIRचा स्वतःचाच आदेश हायकोर्ट जजनी बदलला; नोटीसशिवाय FIR योग्य मानले नाही;

    Meta : मेटाचा 8,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीचा प्लॅन:20 मेपासून; कर्मचारी कपात प्रक्रिया सुरू होईल; जागतिक स्तरावर 10% कर्मचारी कमी होतील