• Download App
    Anna Hazare Urges PM Modi to Lead Global Peace Amid War Crisis VIDEOS जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा- अण्णा हजारे; युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

    Anna Hazare : जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा- अण्णा हजारे; युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

    Anna Hazare

    विशेष प्रतिनिधी

    पारनेर : Anna Hazare जगभरात वाढत चाललेला संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक स्तरावर शांतता आणि संवादासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे.Anna Hazare

    विविध देशांमधील वाढत्या संघर्षांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित होत चालले असून या संघर्षांचा सर्वाधिक फटका निरपराध महिला, मुले आणि कुटुंबीयांना बसत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. युद्धाच्या छायेत जगणाऱ्या या नागरिकांच्या वेदनादायक परिस्थितीबाबतही हजारे यांनी पत्रात चिंता व्यक्त केली आहे.Anna Hazare



    भारताची परंपरा अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. भारताने नेहमीच जगाला संवाद आणि सहजीवनाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे हजारे यांनी नमूद केले. अशा संवेदनशील काळात भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राने मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात अधोरेखित केले. आज जगाला शस्त्रास्त्रांची नव्हे, तर विश्वास आणि संवादाची गरज आहे.

    भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घ्यावी

    भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता आणि संवादाला चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. संवेदनशील काळात भारताने मानवता, शांततेची बाजू घ्यावी.

    Anna Hazare Urges PM Modi to Lead Global Peace Amid War Crisis VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Govt Bans : सरकारने 16 औषध संयोजनांवर बंदी घातली; त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादने देखील समाविष्ट, म्हटले – यांच्या उपचारात फायद्यापेक्षा जास्त धोका

    Ram Mandir : राम मंदिर देणगी चोरी- चंपतराय यांच्यावर कारवाई जवळपास निश्चित:विश्वस्त अनिल यांनाही हटवले जाऊ शकते, SIT योगींना अहवाल सादर करणार

    PM Modi : मोदी म्हणाले- बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न झाला; धार्मिक अजेंडा राबवला गेला, घुसखोरांकडून ताबा मिळवला गेला; आता कायद्याचे राज्य