विशेष प्रतिनिधी
पारनेर : Anna Hazare जगभरात वाढत चाललेला संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक स्तरावर शांतता आणि संवादासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे.Anna Hazare
विविध देशांमधील वाढत्या संघर्षांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित होत चालले असून या संघर्षांचा सर्वाधिक फटका निरपराध महिला, मुले आणि कुटुंबीयांना बसत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. युद्धाच्या छायेत जगणाऱ्या या नागरिकांच्या वेदनादायक परिस्थितीबाबतही हजारे यांनी पत्रात चिंता व्यक्त केली आहे.Anna Hazare
भारताची परंपरा अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. भारताने नेहमीच जगाला संवाद आणि सहजीवनाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे हजारे यांनी नमूद केले. अशा संवेदनशील काळात भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राने मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात अधोरेखित केले. आज जगाला शस्त्रास्त्रांची नव्हे, तर विश्वास आणि संवादाची गरज आहे.
भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घ्यावी
भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता आणि संवादाला चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. संवेदनशील काळात भारताने मानवता, शांततेची बाजू घ्यावी.
Anna Hazare Urges PM Modi to Lead Global Peace Amid War Crisis VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या ठिकाणांवर ईडीचा छापा; सकाळ होण्यापूर्वीच १५ पथके पोहोचली
- Global Alert : इराण युद्धाच्या झळा, तुर्कीवर हल्ल्यानंतर नाटो देश सतर्क, पाकिस्तानवरही युद्धात उतरण्याचा दबाव
- विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा!!
- Inside Story : सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचले!!