• Download App
    Anna Hazare Urges PM Modi to Lead Global Peace Amid War Crisis VIDEOS जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा- अण्णा हजारे; युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

    Anna Hazare : जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा- अण्णा हजारे; युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

    Anna Hazare

    विशेष प्रतिनिधी

    पारनेर : Anna Hazare जगभरात वाढत चाललेला संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक स्तरावर शांतता आणि संवादासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे.Anna Hazare

    विविध देशांमधील वाढत्या संघर्षांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित होत चालले असून या संघर्षांचा सर्वाधिक फटका निरपराध महिला, मुले आणि कुटुंबीयांना बसत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. युद्धाच्या छायेत जगणाऱ्या या नागरिकांच्या वेदनादायक परिस्थितीबाबतही हजारे यांनी पत्रात चिंता व्यक्त केली आहे.Anna Hazare



    भारताची परंपरा अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. भारताने नेहमीच जगाला संवाद आणि सहजीवनाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे हजारे यांनी नमूद केले. अशा संवेदनशील काळात भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राने मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात अधोरेखित केले. आज जगाला शस्त्रास्त्रांची नव्हे, तर विश्वास आणि संवादाची गरज आहे.

    भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घ्यावी

    भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता आणि संवादाला चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. संवेदनशील काळात भारताने मानवता, शांततेची बाजू घ्यावी.

    Anna Hazare Urges PM Modi to Lead Global Peace Amid War Crisis VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    बँका त्यांच्याक डे 100 मिलियन डॉलरपेक्षा जास्त ठेवू शकणार नाहीत; रुपयाच्या सततच्या घसरणीला आळा घालण्यासाठी RBIचे निर्देश

    IndiGo : विशाखापट्टणमहून येणाऱ्या इंडिगो विमानाचे इंजिन फेल; दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; सर्व 160 प्रवासी सुरक्षित

    आसाम मधल्या प्रचारात काँग्रेसच्या अध्यक्षांना मनमोहन सिंग यांची आठवण; मोदींवर विश्वासघाताचा आरोप!!