वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आला आहे. 20 आणि 21 जून रोजी ते महाराष्ट्रात हजर राहणार होते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ते महादेवाचे दर्शन घेणार होते आणि काही कार्यक्रमांचे उद्घाटन करणार होते. याशिवाय ते महाराष्ट्रातच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार होते.Amit Shah’s Maharashtra tour canceled Now Union Home Minister Nityanand Rai will go to Nashik
अमित शहा आज दुपारी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पोहोचणार होते. मंगळवारी सकाळी ते त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. आता हा दौरा रद्द झाला आहे. अमित शहांच्या या सर्व कार्यक्रमांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या आगमनाच्या तयारीसाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार होते.
अमित शाह त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग या गुरुपीठाला भेट देणार होते. श्री मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयाची पायाभरणीही ते करणार होते. पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यानंतर, सर्वांचे लक्ष गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याकडे लागले होते. अमित शहा यांचा दौरा आता रद्द करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा नाशिक दौरा रद्द
गृहमंत्र्यांची ही भेट आध्यात्मिक कारणास्तव होती, ते मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणार होते, पण उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही मतदान होत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. अशा वेळी शहा यांच्या नाशिक दौऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता त्या सर्व अंदाजांना पूर्णविराम मिळाला आहे. आता केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे अमित शाह यांच्या नियोजित सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
Amit Shah’s Maharashtra tour canceled Now Union Home Minister Nityanand Rai will go to Nashik
महत्वाच्या बातम्या
- अग्निपथ हवाई दल : अग्निवीरांना 1 कोटींचा विमा, कॅटिंग सुविधा, 30 सुट्यांसह अनेक सवलतींचा फायदा!!
- विधान परिषद : काँग्रेस धोक्यात, पण माध्यमांनी लावली अजितदादा – फडणवीसांमध्ये चाणक्याची लढाई!!
- राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश : अग्निवीरमुळे तरुणाई नाराज, रस्त्यावर आंदोलन सुरू, वाढदिवस साजरा करू नका
- Agnipath Scheme : सैन्याची तयारी 1989 पासून, अंमलबजावणी 2022 मध्ये; गैरसमज घालविण्यास प्राधान्य!!