नाशिक : जितेंद्र आव्हाड बनले “राहुल गांधी”; निवडणूक लढण्याच्या आधीच दिलीप पराभवाची कबुली!!, असला प्रकार खरंच झालाय. ज्याप्रमाणे राहुल गांधींनी बिहार विधानसभेची निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होण्यापूर्वीच पुढल्या पराभवाची कबुली देण्यासाठी कारणे शोधली, तशीच कारणे जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका निवडणुकांच्या आधी शोधून तसे पत्र निवडणूक आयोगाला पाठविले. Rahul Gandhi
राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपला घेरताना भाजप महाराष्ट्र निवडणुकीतला बिहार निवडणुकीत वापरणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत घोळ घातला, आपल्या बाजूचे मतदार वाढवून घेतले त्याच पद्धतीने बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजप निवडणूक आयोगाच्याच मदतीने घोळ घालून बिहारची निवडणूक जिंकणार आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणता घोटाळा केला?, याविषयी त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सविस्तर लेख लिहिला राहुल गांधींच्या या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तितकेच सविस्तर उत्तर दिले. त्यातून निवडणुकीतला वाद निवडणूक आयोगाच्या गळ्यापर्यंत आणला. पण बिहारमध्ये काँग्रेसची संघटना वाढवण्यात आपल्याला फारसे यश मिळाले नाही. नितीश कुमार यांचा जदयू आणि लालूप्रसाद यादव यांचा राजद या दोन प्रादेशिक पक्षांवर काँग्रेसला मात करता आली नाही, याची कबुली राहुल गांधींनी दिली नाही त्या ऐवजी त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोग यांना घेरण्याचा सोपा मार्ग पत्करला. Rahul Gandhi
पण या सगळ्यातून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे बिहार मधल्या पराभवाचीच कबुली दिली. महाराष्ट्रात काँग्रेस हरली. पक्षाचे फक्त 16 आमदार निवडून आले लोकसभेत 13 खासदार निवडून आणलेल्या काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव राहुल गांधींना पचला नाही म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजप यांना एकाच तागडीत तोलून बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी संशयाचे वातावरण निर्माण केले.
जितेंद्र आव्हाडांचे पत्र
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधींच्याच पावलावर पाऊल टाकले सत्ताधारी पक्ष प्रभाग रचनेमध्ये घोळ घालतील स्वतःला अनुकूलच प्रभाग रचना करतील ऐनवेळेला मतदार वाढवतील, अशा आशयाचे आरोप करणारे पत्र जितेंद्र आव्हाड यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविले.
त्यासाठी त्यांनी 2017 आणि 2022 मधल्या महापालिका निवडणुकांचा अहवाला दिला या कालावधीत सत्ताधारी भाजपने प्रभाग रचनेत घोटाळा केला असा आरोप त्यांनी केला. पण त्या आधीच्या 2002, 2007 आणि 2012 या तीन महापालिका निवडणुकांच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी आघाडीने प्रभाग रचना केली होती, त्याचा उल्लेख मात्र जितेंद्र आव्हाड यांनी पत्रात केला नाही.
जितेंद्र आव्हाड ज्या पक्षात आहेत, ती शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होण्यासाठी उत्सुक आहे. कारण त्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला यायचे आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्याला विरोध करत आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा घोळ अजून पवारांना निस्तरता येत नाही. त्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती भेडसावत आहे. त्यामुळे पराभवाची आधीच कारणे “शोधून” ती निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षावर लादण्याचा प्रकार आव्हाडांनी केला आहे.